War Update : बलुचिस्तान की खैबर पख्तूनख्वा…कोण आधी मुक्त होणार? पाकिस्तानवरून मोठी बातमी; मुनीरचे कंबरडे मोडणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबादस्थित ‘सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज’च्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये २,४१४ लोकांचा मृत्यू झाला, तर २०२४ मधील याच कालावधीत ही संख्या १,५२७ इतकी होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात मृत्यूंमध्ये जवळपास ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीतच ९०१ जणांचा मृत्यू आणि ५९९ जण जखमी झाल्याची नोंद आहे. यातील ९६ टक्क्यांहून अधिक हिंसाचार केवळ खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या दोन प्रांतांमध्ये घडला असून, सर्वाधिक म्हणजे सुमारे ७१ टक्के मृत्यू हे केवळ खैबर पख्तूनख्वामध्ये अधिक नोंदवले गेले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी
खैबर पख्तूनख्वामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. शरिया कायद्याची अंमलबजावणी आणि सरकारविरोधी प्रचार यांच्या जोरावर या संघटनेने अनेक भागांत आपली पकड निर्माण केली आहे. त्याच वेळी अफगाण तालिबानचे वैचारिक आणि कधी-कधी प्रत्यक्ष हस्तक्षेपही या प्रांतात आढळून येतात. दुसरीकडे, बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि इतर सशस्त्र गट संसाधनांचे शोषण, राजकीय उपेक्षा आणि लष्करी अत्याचारांच्या विरोधात अनेक दशके संघर्ष करत आहेत. परिणामी, काही भागात पाकिस्तानी सैन्याला प्रवेश करणेही कठीण झाले आहे, इतकी बंडखोरांची ताकद वाढली आहे.
या सर्व परिस्थितीत पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्यातील अंतर्गत संघर्षही अधिक वाढला आहे. नागरी सरकार आपली पकड गमावत असताना लष्कर आपल्या निर्णयांवर थेट अंमलबजावणी करत असल्याचे चित्र दिसते. अनेकदा या हल्ल्यांसाठी भारतावर आरोप ठेवले जातात आणि प्रत्येक घटनेला ‘परकीय कट’ म्हणून रंगवले जाते. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी या सशस्त्र उठावांना ‘फितना अल-खवारीज’ असे संबोधत त्यांना धार्मिक दृष्टिकोनातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही.
Pakistan is in turmoil—facing rising #conflict with #India and a raging civil war in #Balochistan. The #BLA killed 14 #Pakistani soldiers, including top commanders. 3 blasts and a #HAROP drone strike hit #Lahore. #Pakistan is bleeding—badly.#IndiaPakistanWar #balochistanfreedom pic.twitter.com/f6Fcq1U4pk — Buddha D. (@itsbuddhadebpan) May 8, 2025
credit : social media and Twitter
असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अंतर्गत स्थिती अधिकच ढासळत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आक्रमक वक्तव्ये करून, सीमावाद उकरून काढून आणि भारतासोबत तणाव वाढवून आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेणे, तसेच परकीय आर्थिक मदत मिळवणे ही त्यांची प्रमुख रणनीती मानली जाते. काही अहवालांनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असूनही मुनीर यांनी स्वतःसाठी ‘फील्ड मार्शल’ ही पदवी मिळवून स्वतःचे राजकीय आणि लष्करी स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा जनतेवर आणि देशाच्या भविष्यासाठी उलट परिणाम होत असल्याची भावना वाढत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Powerful Women : जगातील सर्वात मोठ्या महासत्तेवरही नारीशक्तीचाच वरदहस्त; पुतिनची ‘Lady Brigade’ ठरवते रशिया आणि जगाचे भविष्य
सध्याची परिस्थिती पाहता, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा हे केवळ बंडखोरीचे केंद्र न राहता पाकिस्तानच्या एकात्मतेला आणि अस्तित्त्वालाच आव्हान देणारे भटके अग्नीकुंड बनत चालले आहेत. जर वेळीच ठोस आणि शांततामय राजकीय तोडगा काढला गेला नाही, तर ‘कोण आधी स्वतंत्र होणार?’ हा प्रश्न फक्त चर्चेपुरताच न राहता एक भयावह वास्तव ठरू शकतो.
Ans: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये.
Ans: राजकीय उपेक्षा, संसाधनांचे शोषण आणि दहशतवादी संघटनांचा प्रभाव.
Ans: देशाची एकता आणि स्थैर्य धोक्यात येऊ शकते.






