• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Who Exactly Has The Remote Control Of Indias Nuclear Bomb

भारतातील अणुबॉम्बचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे असतो? वाचा एका क्लीकवर…

India nuclear command authority : पाकिस्तानकडून सातत्याने मिळणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 05, 2025 | 09:30 PM
Who exactly has the remote control of India's nuclear bomb

भारतातील अणुबॉम्बचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे असतो? वाचा एका क्लीकवर... ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India nuclear command authority : पाकिस्तानकडून सातत्याने मिळणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. विशेषतः अलीकडे झालेल्या पहलगाममधील हिंसाचारानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीयांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताच्या अणुबॉम्बवरील नियंत्रण नेमकं कोणाकडे आहे? रिमोट पंतप्रधानांकडे आहे का, राष्ट्रपतींकडे की लष्कराकडे?

हा प्रश्न जितका गंभीर, तितकाच त्याचा उत्तरही संयमाने समजून घेण्यासारखा आहे. भारत हा अण्वस्त्रांचा जबाबदार वापर करणारा देश मानला जातो. भारताचे धोरण नेहमीच ‘No First Use’ (प्रथम वापर न करण्याचे धोरण) राहिले आहे, म्हणजे भारत कधीच कोणत्याही देशावर पहिले अणुहल्ला करणार नाही. परंतु, देशावर अणुहल्ला झाल्यास त्याला प्रतिउत्तर देण्याची क्षमता आणि यंत्रणा भारताकडे आहे – आणि ही यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध व राजकीय-लष्करी समन्वयावर आधारित आहे.

‘न्यूक्लियर कमांड अथॉरिटी’चा संपूर्ण अधिकार

भारतात अण्वस्त्रांच्या वापराचा अंतिम निर्णय न्यूक्लियर कमांड अथॉरिटी (NCA) या संस्थेकडे असतो. ही यंत्रणा दोन स्तरांवर कार्य करते – राजकीय परिषद (Political Council) आणि कार्यकारी परिषद (Executive Council). राजकीय परिषद ही या संपूर्ण यंत्रणेचा सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि तिचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान. हेच एकमेव पद आहे ज्याच्याकडे अणुहल्ल्याचा अधिकृत आदेश देण्याचा अधिकार आहे. परंतु, ही प्रक्रिया एकट्या व्यक्तीच्या निर्णयावर आधारित नाही – निर्णय घेण्यापूर्वी सुरक्षा सल्लागार, लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशिया मदत करण्यास सज्ज…’ मॉस्कोकडून मोठे विधान, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत दिली ‘ही’ ऑफर

कार्यकारी परिषदेची जबाबदारी

कार्यकारी परिषद ही राजकीय परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. याचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor) करत असतो. या परिषदेचे काम म्हणजे राजकीय परिषदेने दिलेल्या आदेशानुसार प्रत्यक्ष तांत्रिक व लष्करी कारवाईची तयारी करणे व योग्य वेळेस ती अंमलात आणणे.

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) – अंमलबजावणी करणारी शक्ती

अण्वस्त्र प्रणालीचे प्रत्यक्ष नियंत्रण आणि लाँचिंगची जबाबदारी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) या लष्करी संस्थेकडे असते. ही संस्था तीनही सैन्यदलांमध्ये सामंजस्य ठेवून अण्वस्त्रयुक्त क्षेपणास्त्रांचे तैनाती व नियंत्रण करते. SFC हा प्रधानमंत्र्यांच्या आदेशांवर काम करणारा अंमलबजावणी करणारा घटक आहे.

भारतात रिमोट एकट्या कुणाकडेच नाही

लोकांच्या मनात अनेकदा असा समज असतो की पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीकडे एक ‘रेड बटण’ असतो – पण वास्तविकता अशी आहे की भारतामध्ये कोणत्याही एका व्यक्तीकडे अणुबॉम्बचा ‘रिमोट कंट्रोल’ नाही. हा निर्णय अनेक स्तरांच्या सल्ल्यानंतरच घेतला जातो.

अण्वस्त्र धोरणामागील भारताची भूमिका

भारताने 1998 मध्ये अणुचाचण्या केल्यानंतर स्वतःला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र म्हणून घोषित केले, पण त्याचवेळी स्पष्टपणे सांगितले की भारतीय अण्वस्त्रे हे संरक्षणात्मक हेतूने आहेत, आक्रमणासाठी नव्हे. No First Use हे धोरण स्वीकारून भारताने जगाला शांततेचा संदेश दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात दाखल, एर्दोगान यांचे रणनीतिक पाऊल; काय असेल भारताचा डाव?

 जबाबदारी, संयम आणि सुरक्षित नियंत्रण

पाकिस्तानकडून येणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्यांदरम्यान भारताची अण्वस्त्र व्यवस्था घाईगडबडीने निर्णय घेणारी नाही, तर सुसंगत आणि शिस्तबद्ध यंत्रणा असलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत, भारताचे नेतृत्व अण्वस्त्रांच्या वापराच्या निर्णयात जबाबदारी, संयम आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करते. म्हणूनच, भारताचा अणुबॉम्ब कोणत्याही एका हातात नाही, तर तो आहे एका सक्षम, संतुलित आणि सुरक्षारक्षक यंत्रणेत.

Web Title: Who exactly has the remote control of indias nuclear bomb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • india
  • Nuclear missiles
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा
1

Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य
2

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’
3

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
4

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाना

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाना

Vinfast Limo Green इलेक्ट्रिक MPV भारतात येणार? सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज

Vinfast Limo Green इलेक्ट्रिक MPV भारतात येणार? सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज

Silver Jewellery New Rule: 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू, खऱ्याखोट्याची त्वरीत ओळख पटणार

Silver Jewellery New Rule: 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू, खऱ्याखोट्याची त्वरीत ओळख पटणार

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.