• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Who Exactly Has The Remote Control Of Indias Nuclear Bomb

भारतातील अणुबॉम्बचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे असतो? वाचा एका क्लीकवर…

India nuclear command authority : पाकिस्तानकडून सातत्याने मिळणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 05, 2025 | 09:30 PM
Who exactly has the remote control of India's nuclear bomb

भारतातील अणुबॉम्बचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे असतो? वाचा एका क्लीकवर... ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India nuclear command authority : पाकिस्तानकडून सातत्याने मिळणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. विशेषतः अलीकडे झालेल्या पहलगाममधील हिंसाचारानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीयांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताच्या अणुबॉम्बवरील नियंत्रण नेमकं कोणाकडे आहे? रिमोट पंतप्रधानांकडे आहे का, राष्ट्रपतींकडे की लष्कराकडे?

हा प्रश्न जितका गंभीर, तितकाच त्याचा उत्तरही संयमाने समजून घेण्यासारखा आहे. भारत हा अण्वस्त्रांचा जबाबदार वापर करणारा देश मानला जातो. भारताचे धोरण नेहमीच ‘No First Use’ (प्रथम वापर न करण्याचे धोरण) राहिले आहे, म्हणजे भारत कधीच कोणत्याही देशावर पहिले अणुहल्ला करणार नाही. परंतु, देशावर अणुहल्ला झाल्यास त्याला प्रतिउत्तर देण्याची क्षमता आणि यंत्रणा भारताकडे आहे – आणि ही यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध व राजकीय-लष्करी समन्वयावर आधारित आहे.

‘न्यूक्लियर कमांड अथॉरिटी’चा संपूर्ण अधिकार

भारतात अण्वस्त्रांच्या वापराचा अंतिम निर्णय न्यूक्लियर कमांड अथॉरिटी (NCA) या संस्थेकडे असतो. ही यंत्रणा दोन स्तरांवर कार्य करते – राजकीय परिषद (Political Council) आणि कार्यकारी परिषद (Executive Council). राजकीय परिषद ही या संपूर्ण यंत्रणेचा सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि तिचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान. हेच एकमेव पद आहे ज्याच्याकडे अणुहल्ल्याचा अधिकृत आदेश देण्याचा अधिकार आहे. परंतु, ही प्रक्रिया एकट्या व्यक्तीच्या निर्णयावर आधारित नाही – निर्णय घेण्यापूर्वी सुरक्षा सल्लागार, लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशिया मदत करण्यास सज्ज…’ मॉस्कोकडून मोठे विधान, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत दिली ‘ही’ ऑफर

कार्यकारी परिषदेची जबाबदारी

कार्यकारी परिषद ही राजकीय परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. याचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor) करत असतो. या परिषदेचे काम म्हणजे राजकीय परिषदेने दिलेल्या आदेशानुसार प्रत्यक्ष तांत्रिक व लष्करी कारवाईची तयारी करणे व योग्य वेळेस ती अंमलात आणणे.

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) – अंमलबजावणी करणारी शक्ती

अण्वस्त्र प्रणालीचे प्रत्यक्ष नियंत्रण आणि लाँचिंगची जबाबदारी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) या लष्करी संस्थेकडे असते. ही संस्था तीनही सैन्यदलांमध्ये सामंजस्य ठेवून अण्वस्त्रयुक्त क्षेपणास्त्रांचे तैनाती व नियंत्रण करते. SFC हा प्रधानमंत्र्यांच्या आदेशांवर काम करणारा अंमलबजावणी करणारा घटक आहे.

भारतात रिमोट एकट्या कुणाकडेच नाही

लोकांच्या मनात अनेकदा असा समज असतो की पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीकडे एक ‘रेड बटण’ असतो – पण वास्तविकता अशी आहे की भारतामध्ये कोणत्याही एका व्यक्तीकडे अणुबॉम्बचा ‘रिमोट कंट्रोल’ नाही. हा निर्णय अनेक स्तरांच्या सल्ल्यानंतरच घेतला जातो.

अण्वस्त्र धोरणामागील भारताची भूमिका

भारताने 1998 मध्ये अणुचाचण्या केल्यानंतर स्वतःला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र म्हणून घोषित केले, पण त्याचवेळी स्पष्टपणे सांगितले की भारतीय अण्वस्त्रे हे संरक्षणात्मक हेतूने आहेत, आक्रमणासाठी नव्हे. No First Use हे धोरण स्वीकारून भारताने जगाला शांततेचा संदेश दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात दाखल, एर्दोगान यांचे रणनीतिक पाऊल; काय असेल भारताचा डाव?

 जबाबदारी, संयम आणि सुरक्षित नियंत्रण

पाकिस्तानकडून येणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्यांदरम्यान भारताची अण्वस्त्र व्यवस्था घाईगडबडीने निर्णय घेणारी नाही, तर सुसंगत आणि शिस्तबद्ध यंत्रणा असलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत, भारताचे नेतृत्व अण्वस्त्रांच्या वापराच्या निर्णयात जबाबदारी, संयम आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करते. म्हणूनच, भारताचा अणुबॉम्ब कोणत्याही एका हातात नाही, तर तो आहे एका सक्षम, संतुलित आणि सुरक्षारक्षक यंत्रणेत.

Web Title: Who exactly has the remote control of indias nuclear bomb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • india
  • Nuclear missiles
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
1

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
2

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
3

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Farmer Suicide:  १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर
4

Farmer Suicide: १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.