टोयोटा किर्लोस्कर मोटर भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे. शाश्वत मोबिलिटी, ग्राहक-केंद्रित नवकल्पना आणि दीर्घकालीन उत्पादन गुंतवणूक या संतुलित धोरणावर कंपनी भर देत आहे. टोयोटासाठी भारत हा जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाचा वाढीचा बाजार असून, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करताना देशाच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणे हे कंपनीच्या दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू आहे.
पश्चिम भारताचा मजबूत परफॉर्मन्स कायम
पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि मध्यप्रदेश यांचा समावेश असून, हा विभाग टोयोटाच्या वाढीच्या कहाणीतील महत्त्वाचा भाग ठरत आहे. जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत टीकेएमने या विभागात ३५,४७२ गाड्यांची विक्री केली. ही विक्री कंपनीच्या राष्ट्रीय विक्रीतील १,५२,७८४ युनिट्सपैकी २३% इतकी आहे. २०२६ मधील याच कालावधीत ३०,४७४ गाड्यांची विक्री झाली होती. म्हणजेच १६% वाढ नोंदवली गेली असून, ग्राहकांचा विश्वास आणि बाजारातील मजबूत पकड याची पुष्टी होते.
‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’, भारत आणि जपानच्या ऑटो क्षेत्रातील संयुक्त उपक्रमाची वाटचाल
कंपनीच्या कामगिरीवर भाष्य करताना, सिमंत अरुण, उपाध्यक्ष व मुख्य प्रतिनिधी – पश्चिम विभाग, टोयोटा किर्लोस्कर मोटर यांनी सांगितले , “पश्चिम भारताचे योगदान केवळ स्थिर नाही तर धोरणात्मकही आहे. टियर २ आणि टियर ३ शहरांमधून विक्री सातत्याने वाढत आहे. या विभागाच्या कामगिरीला टोयोटाच्या वाढत्या रिटेल नेटवर्क, हायब्रिड पोर्टफोलिओ आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांचा आधार मिळाला आहे. वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी आशावादी दृष्टिकोन असून, नवीन मॉडेल्स, स्थानिक उपक्रम आणि सणासुदीच्या मागणीमुळे ही गती आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.”
टोयोटाच्या पुढील उत्पादन टप्प्याला महाराष्ट्राचा आधार
दीर्घकालीन वाढीच्या योजनेंतर्गत, टोयोटा किर्लोस्कर मोटरने अलीकडेच महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नवीन वाहन उत्पादन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. २०२९ च्या पहिल्या सहामाहीत उत्पादन सुरू होणार असून, या नवीन प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता १००,००० वाहनांची असेल. या प्रकल्पामुळे सुमारे २,८०० रोजगार निर्माण होणार आहेत. बिडकीन हे ठिकाण औद्योगिक इकोसिस्टम, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, प्रमुख बंदरांजवळील जवळीक आणि अनुकूल लॉजिस्टिक सुविधांमुळे धोरणात्मक ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हे केंद्र कर्नाटकातील टोयोटाच्या विद्यमान उत्पादन केंद्राला पूरक ठरेल. यामुळे बाजारपेठेत अधिक चांगली पोहोच, जलद वितरण वेळ आणि अधिक परिचालन लवचिकता साध्य होईल.
बहु-मार्गीय दृष्टिकोनातून कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याकडे वाटचाल
टोयोटाचा विश्वास आहे की भारताच्या विविध मोबिलिटी गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच तंत्रज्ञानावर अवलंबून राहता येणार नाही. त्याऐवजी विविध तंत्रज्ञानांचा एकत्रित वापर आवश्यक आहे. बॅटरी इलेक्ट्रिक वाहन, स्ट्राँग हायब्रिड्स, प्लग-इन हायब्रिड्स, फ्लेक्स-फ्युएल आणि इतर हे सर्व मोठ्या प्रमाणावर कार्बन कमी करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या पर्यायासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतीय ग्राहकांकडून इलेक्ट्रिफाइड मोबिलिटी सोल्यूशन्सला मिळणाऱ्या वाढत्या स्वीकाराचे प्रतिबिंब म्हणून, टोयोटा किर्लोस्कर मोटरने अलीकडेच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतात एकूण हायब्रिड वाहनांची विक्री ३ लाख युनिट्स ओलांडली आहे. हायब्रिड क्षेत्रातील आपले नेतृत्व अधिक मजबूत करताना, अर्बन क्रूझर हायरायडर हायब्रिड आणि इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड यांनी अलीकडेच २ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. यामुळे सेल्फ-चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानावरील ग्राहकांचा मजबूत विश्वास अधोरेखित झाला आहे. अर्बन क्रूझर हायरायडर टोयोटाच्या वाढीतील महत्त्वाचा घटक ठरला आहे. देशांतर्गत बाजारात त्याने सातत्यपूर्ण गती राखली असून, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
हायरायडर हायब्रिड आणि इनोव्हा हायक्रॉस हायब्रिडसोबत वेलफायर हायब्रिड आणि कॅम्री हायब्रिडही टोयोटाच्या इलेक्ट्रिफाइड मोबिलिटी सोल्यूशन्सच्या व्यापक स्वीकाराला प्रोत्साहन देत आहेत. इलेक्ट्रिफिकेशनच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे टोयोटाने अलीकडेच भारतात आपले पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन अर्बन क्रूझर एबेला इ३ लाँच केले आहे. याची एक्स-शोरूम किंमत २३.६० लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यामुळे कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्यासाठी टोयोटाची बहुपथीय वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे.






