काय घडलं नेमकं?
प्रीती भाकड असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रीती नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे अकादमीच्या इतर विद्यार्थ्यांसोबत शारीरिक सरावासाठीअंबड शहराच्या जवळील वलखेडा शिवार येथील खंडण परिसरात गेली होती. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पोहण्याची कोणतीही अट किंवा अनिवार्य सराव नसतानाही अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांनी प्रीतीला खदाणीच्या खोल पाण्यात उतरण्यास भाग पाडले.प्रीतीला पोहोत येत नव्हते. याची माहिती प्रशिक्षण देणाऱ्यांना होती तरीही पाण्यात उतरायला लावले. पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने प्रीती बुडू लागली, तिला वाचवण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.हा मोठा निष्काळजीपणा असल्याचे समोर आले आहे.
प्रीतीला तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याची घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. प्रीतीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी प्रीतीचे वडील अंशीराम एकनाथ भाकड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: मृत तरुणीचे नाव प्रीती भाकड असे होते.
Ans: जालन्यातील अंबड तालुक्यातील वलखेडा शिवारातील खदान परिसरात ही घटना घडली.
Ans: अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश वायसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






