नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव राज असे आहे. राज हा इंदू यांना मोठे आजी म्हणायचा. हे दोघेही एकत्र राहत होते. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी राजने घरातून आजीची एटीएम कार्ड चोरले आणि त्यातून 20000 रुपये काढले होते. ही बाब लक्षात येतात आजी त्याला सतत रागवत होती. बुधवारी रात्री राज दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी आजी त्याला पुन्हा चोरलेल्या पैशांवरून रागावली. यावरून राज चिडला आणि रागाच्या भरात त्याने आजीच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूने वार केले. या आजी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रयत्न केला. त्यांनी खोलीत सांगितले रक्त साफ केले आणि या हप्ते साठी वापरण्यात आलेल्या साहित्य लपवून ठेवले.
Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?
दुसऱ्या दिवशी गुरुवारी खोलीतून कोणतीही हालचाल झाली नाही तसेच राज कोणालाही कारणाशिवाय घरात जाण्यापासून रोखत राहिला. शुक्रवारी सकाळी पाणी न आल्यामुळे जेव्हा दुसरा भाऊ दीपक हा पाहायला गेला तेव्हा त्याला इंदू यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. कातडीने त्याने ह्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी चाकूचे कव्हर आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. श्वान पथकाच्या मदतीने आणि रक्ताच्या डागावरून राज ला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पाच पावली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा
Ans: किशोरी उर्फ इंदू असे मृत आजीचे नाव होते.
Ans: आरोपीने एटीएममधून 20 हजार रुपये काढले होते.
Ans: श्वान पथक आणि पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.






