बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…
पोलिसांनी गुन्हा का दाखल केला ?
रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 189(1), 189(2) आणि 190 अन्वये नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये जी कलम लावली आहेत. त्यांना या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे. घटनेतील फिर्यादी हे रबाळे पोलीस ठाण्यातीलच पोलीस उपनिरीक्षक युनूस इब्राहिम शेख आहेत. जे पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. नातेवाईक मध्ये सचिन सुभाष राठोड, राद्वीत राजू राठोड, राजू पांडू राठोड, राजू चंदू राठोड यांच्यासह अन्य चार ते सहा अनोळखी लोकांचा या मध्ये समावेश असून, हे सर्वजण मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. सध्या ते मुंबईतील बदलापूर येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र २१ मे २०२६ रोजी घरातील सगळे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यावर गोंधळ झाला. सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई परिसरात मुली गायब होण्याच प्रमाण वाढलं
नवी मुंबई परिसरात सातत्याने नागरिक तक्रार करत आहेत. या परिसरातून मुल गायब होण्याच प्रमाण वाढलं आहे. लहान मुल सुरक्षित नाहीत. मात्र मुलगी गायब झाल्यावर पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेल्यावर घरातील व्यक्तीवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही पोलीस स्टेशनला येवून न्याय नाही मागणार तर कुठे जाणार? असा सवाल आता नातेवाईक व्यक्त करत आहेत. सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेत रबाळे पोलीस अधिकच तपास करत आहेत. या मुलगी कुठे गायब झाली? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपासून मुलगी गायब आहे तिचा शोध घेतला जात आहे.
Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या
Ans: नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात ही घटना घडली.
Ans: सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
Ans: बेपत्ता मुलीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.






