Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध: आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग 'शोधमोहिमे'वर ठरणार
विधान परिषदेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांच्या बेपत्ता प्रकरणांचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणांमध्ये शासनाने कोणती ठोस पावले उचलली आहेत, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.
उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, सन २०२४ मध्ये राज्यात ४५,६६२ महिला आणि ११.३१६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर २०२५ मध्ये ४८, २७८ महिला आणि १२,११३ मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२५ मध्ये २.६१६ महिला आणि ७९७ मुली अधिक बेपत्ता झाल्याची कबुली त्यांनी दिली.
Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा
आता बेपत्ता मुली आणि महिलांच्या शोधासाठी विशेष पथके संबंधित पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्यांचे नामांकन निश्चित केले जाईल,
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
वर्ष उलटल्यानंतर काही प्रकरणांत कुटुंबीय तसेच पोलिसांचा पाठपुरावा कमी होतो, ही बाब चिंताजनक असल्याचे फडणवीस म्हणाले. या पार्श्वभूमीवर दरमहा अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेतली जाते. महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेतला जातो. (Maharashtra Police)
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१, १९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांपैकी सुमारे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचते. महिलांच्या शोधदरात सध्या १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमांना आता तंत्रज्ञानाची मोठी साथ मिळत आहे. केवळ मानवी तपासावर अवलंबून न राहता, पोलीस आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत डेटाबेचा वापर करत आहेत.
Cheese Doodle Day: जिभेवर विरघळणारं चीज अन् कुरकुरीत मका, लहानपणच्या ‘त्या’ चवीची आठवण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत, जुलै २०१५ पासून आतापर्यंत या मोहिमेच्या १३ टप्प्यांमध्ये ४१,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आहे. सध्या राज्यात या मोहिमेचा १४ वा टप्पा (२० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६) राबवण्यात आला, ज्यामध्ये केवळ एका महिन्यात १,४०१ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा मिळवून देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी एकूण ८६,२२८ महिला आणि मुलींचा यशस्वीपणे शोध घेतला आहे. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी सर्वाधिक कामगिरी केली आहे.
सरकारने मानवी तस्करी आणि बेपत्ता प्रकरणांसाठी काही अत्यंत आधुनिक ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित केल्या आहेत. नागपूर पोलिसांनी महाराष्ट्रात प्रथमच ‘गरुड दृष्टी’ आणि AI-आधारित चेहरा ओळखणारी चेहरा ओळखण्याची प्रणाली (Facial Recognition System – FRS) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी ८ हून अधिक हाय-टेक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये बेपत्ता व्यक्ती आणि संशयित मानवी तस्करांचा डेटा फीड केलेला असतो. संशयित दिसताच हे कॅमेरे तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) अलर्ट पाठवतात.






