फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?
काय घडलं नेमकं?
या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सुनीता अक्षयलाल पाल (वय 46) असे आहे. ती पाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचे पती अक्षयलाल पाल यांच्यासह त्या भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. त्यावेळी राहनाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेली आणि घसरली. अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला पडले. मात्र सुनीता या रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदे शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत, तसेच दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव
ठाणे येथून एक सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला एक २६ वर्षीय तरुण बळी पडला. या तरुणाची तब्बल 1.36 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी शिताफीने जाळे विणून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण
Ans: ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाजवळ.
Ans: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरल्याने अपघात झाला.
Ans: नारपोली पोलीस तपास करत असून नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.






