(फोटो सौजन्य: Pinterest)
Accident News: साताऱ्यात मध्यरात्री भीषण अपघात; कार 3 वेळा पलटी, एका तरुणाचा जागीच मृत्यू
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मृताचे वडिल राजकुमार महतोने प्रकरणासंबंधित बोलताना सांगितले की, रवी साधारण सहा वर्षांपासून वडोदराच्या एक प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. मृत्यूच्या दहा दिवसांपूर्वी तो घरी (बिहार) परतला होता. त्यांनी असा दावा केली की, रवी न सांगता पत्नीचे सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण घेऊन गेला ज्याची माहिती कुटुंबाला नंतर मिळाली. वडिलांनी सांगितले की, यावरुन रवी आणि त्याच्या मित्राला ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय कुटुंबाला आला होता.
कुटुंबाने सांगितले की, शेखपूरा येथील रवीचा जवळचा मित्र रोहित वडोदरा जाणार होता, परंतु रवीच्या आगमनानंतर काही दिवसांनीच त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर रवीने आपल्या आईसोबत फोनवर बोलताना सांगितले की, “माझा मित्र मेला, आता मी पण वाचणार नाही”. या संभाषणाच्या काही दिवसांनंतरच वडोदराच्या मकरपुरा रेल्वे स्थानकाजवळ कथिररित्या मालगाडीसमोर उडी मारुन रवीने आपला जीव संपवला.
एकत्र राहणाऱ्या तीसऱ्या मित्रानेही संपवले आयुष्य
मृत्यूचे हे प्रकरण फक्त इथेच संपले नाही तर रवीच्या मृत्यूनंतर वडोदरात त्याच्यासोबत रुम शेअर करणाऱ्या मित्रानेही खोलित फाशी घेऊन जीवन संपवले. तीसरा मित्र विकास कुमार हा उत्तर प्रेदेशमधील गोरखपूर येथील रहिवासी होता. त्याने खोलितच गळफास घेत आत्महत्या केली. तीन्ही मित्र बऱ्याच काळापासून एकत्र राहत होते. तीघेही अनेकदा त्यांचे गाव रोह इथे येत असायचे आणि काही दिवसांचा मुक्कामही करायचे.
Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू
ब्लॅकमेलिंगचा संशय
एकानंतर एक तीनही मित्रांनी अशी आत्महत्या केल्या कारणाने स्थानिक पातळीवर त्यांच्या मृत्येचे कारण ब्लॅकमेलिंग असल्याचा संशय घेतला जात आहे. तथापि, या दाव्याला अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नसून पोलिस घटनेचा तपास करत आहेत. सध्या तीनही मित्रांच्या मृत्यूचे खरे कारण गूढ असून संबंधित संस्थांच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.






