फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, ही मालिका सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी केलेला संघर्ष दाखवणारे कथानक अद्याप प्रसारित व्हायचे आहे. या भागासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी ऑडिशन्सही घेण्यात आल्या होत्या. मात्र हे महत्त्वाचे कथानक येण्यापूर्वीच मालिकेच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
टेन्शन घेण्याची गरज नाही!
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका बंद तर होणारच आहे परंतु त्यासाठी किमान 3 महिन्यांची कालावधी आहे. 3 महिन्यांनंतर या मालिकेचे प्रक्षेपण थांबवण्यात येणार आहे. तसेच या जागी नव्या मालिकांची भरती तर होतच आहे.
नवीन मालिकांसाठी जागा
दरम्यान, स्टार प्रवाहने नव्या मालिकांची घोषणा करत आपला कार्यक्रमपट बदलण्याची तयारी केली आहे. ‘सुना येती घरा’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिचा प्रोमो सध्या 7.30 वाजताच्या स्लॉटमध्ये दाखवला जात आहे. याच वेळेत सध्या ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका प्रसारित होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी कलाकारांबाबत मोठी उत्सुकता होती आणि अमोल कोल्हे तसेच मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही प्रमाणात मालिकेला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मालिकेच्या बंद होण्यामागील नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.






