(फोटो सौजन्य: Pinterest)
कुठे आहे हे शहर?
आम्ही तुम्हाला सांगतो की, मँगो सिटी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर मालदा आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर भागात ते वसले आहे. मालदा हे शहर फक्त आंब्यासाठीच नाही तर याच्या समृद्ध इतिहासासाठीही ओळखले जाते. येथे फाजली, हिमसागर आणि लक्ष्मणभोग यांसारख्या स्वादिष्ट आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देश-विदेशात यांची निर्यात देखील केली जाते.
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
मालद्यातील आंबे इतके खास का आहेत?
मालद्यातील आंबे हे त्याच्या आकारासाठी खास मानले जातात. गोड चव आणि रसरशीत पोत या आंब्यांची चव आणखी वाढवते. यातील फाजली हा आंब्याचा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हे त्याच्या मोठ्या आकारासाठी आणि अत्यंत गोड चवीसाठी ओळखला जातो.
इथे कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येऊ शकते
मालद्यात फक्त आंबेच नाही तर येथील सुंदर ऐतिहासिक स्थळांनाही भेट देता येते.
गाैर
इथले गाैर हे प्राचीन शहर आपल्या ऐतिहासिक इमारती आणि मिशिदीसाठी लोकप्रिय आहे. इथे अनेक प्राचीन इस्लामिक वास्तुकलेचे नमुने, मशीद आणि किल्ले पाहायला मिळतात.
पांडुआ
१४ व्या शतकात हे शहर बंगालच्या सल्तनतची राजधानी होते आणि एक भरभराटीचे व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र होते. इथे अदिना मशीद आणि इतर स्मारके नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात.
रामाकेली
मालदा शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
भेट देण्याची उत्तम वेळ?
मालद्याला भेट देण्याचा सर्वाेत्तम काळ उन्हाळा मानला जातो. विशेषत: मे ते जुलै दरम्यानचा काळ यासाठी परफेक्ट मानला जातो कारण याकाळात इथे आंबे भरपूर प्रमाणा उपलब्ध होतात. तुम्हाला सर्वात ताज्या आणि विविध प्रकाराच्या आंब्याचा स्वाद इथे घेता येतो. तुम्हाला उन्हाचा त्रास नको असल्यास तुम्ही हिवाळ्यातही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
कसे पोहोचायचे?
रेल्वे
मालद्याला जाण्यासाठी रेल्वे हा मार्ग स्वस्त पर्याय आहे. मालदा हे प्रमुख जंक्शन आहे जिथून प्रमुख शहरांसाठी रेल्वेगाड्या जातात. मुंबईहून याचे अंतर साधारण २२७२ किमी ते २३२२ किमी आहे.
रस्त्याने
रस्ते मार्गाने मालद्याला पोहचायचे असेल तर बस किंवा खाजगी गाड्याचा पर्याय परफेक्ट आहे. मुंबई ते मालदा रस्ते मार्गे अंदाजे २००० ते २३०० किमी आहे. नॉन-स्टॉप गाडी चालवल्यास साधारणपणे ३५ ते ४० तासांत इथे पोहचता येते.
हवाई मार्ग
इथे जाण्यासाठी सर्वात वेगवान मार्ग म्हणजे विमानाचा प्रवास. इथे सर्वात जवळचे विमानतळ बागडोगरा आहे, जिथून टॅक्सी करुन तुम्ही मालद्याला पोहचू शकता.






