शहरासह ग्रामीणमध्येही साथ रोगाचे थैमान! टायफाईड, मलेरीया, डेंग्यूचे रूग्ण वाढले; १ हजार आयवी सेटची मागणी
ग्रामीण भागात साथरोगसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मागील महिनाभरात डायरिया (अतिसार), टायफाईड, मलेरिया, डेंग्यू या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अनेक गावात दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यातून जलजन्य आजारांचा फैलाव होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आयव्ही सेटचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना गरज असतानाही सलाईन देणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने वर्धा येथून १ हजार आयवी सेटची मागणी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
जिम ट्रेनर बनायचंय? ही महत्त्वाची कौशल्ये बाणावी लागतील तुमच्या अंगी! पाहून घ्या टिप्स आणि ट्रिक्स
जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४५५ आरोग्य उपकेंद्रे आहेत. यंदा पावसाने उघडीप दिल्याने साथरोगांचा फैलाव वाढत आहे. त्यातही डायरियाचे रुग्ण गावागावांत दिसू लागले आहेत.उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने सकाळी ८:३० ते दुपारी १२ पर्यंत रुग्ण तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर गृहभेटी द्याव्या, असे निर्देश आहेत. मात्र, यावर बहुतांश ठिकाणी काम होत नाही. २१२ उपकेंद्रांतच समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असून, उर्वरित उपकेंद्रातील जागा रिक्त आहे. यामुळे त्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांत संदर्भित आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. एएनएम यांच्याकडे प्रामुख्याने लसीकरणाची जबाबदारी दिली आहे.
महिन्यातील दोन हप्ते लसीकरण, तिसऱ्या आठवड्यात अहवाल तयार करणे व शेवटच्या आठवड्यात मुख्यालयी राहणे असा कार्यक्रम आखून दिला आहे. यामुळे ग्रामीण भागात आता आरोग्य सेवेची स्थिती गंभीर बनली आहे.पांढरकवडा शहरातील स्वच्छता व्यवस्था ढासळल्याने येथे डेंग्यु, मलेरीया व डायरीयाचा धोका वाढला आहे. दररोज ५०० ते ६०० रूग्ण उपजिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी येत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढरकवडा शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात तुंबलेले नाले, साचलेले सांडपाणी, रस्त्यांवरील कचऱ्याचे ढिगारे, वाढता डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप यांसह हगवण (डायरिया) साथीचा धोका वाढत आहे. असे युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी सांगितले.
Ans: सध्या टायफाईड, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांचे रुग्ण शहरासह ग्रामीण भागात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Ans: सतत ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, उलट्या, थंडी वाजणे तसेच डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणे ही प्रमुख लक्षणे असू शकतात.
Ans: स्वच्छ पाणी पिणे, अन्नाची स्वच्छता राखणे, डासांची उत्पत्ती होऊ न देणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आणि डासप्रतिबंधक उपायांचा वापर करणे आवश्यक आहे.






