Shivsena UBT, Jantar Mantar, CJP Protest, Aaditya Thackeray on AK 47
स्पर्धा परीक्षांच्या उत्तरपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) विरोधात शांततापूर्ण मार्गाने जाब विचारणाऱ्या निशस्त्र विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे.
“इलेक्ट्रिक शॉक देणाऱ्या काठ्या (बॅटन्स), पेलट गन्स, इलेक्ट्रिक शॉक देणारे बॅरिकेट्स, गंजलेल्या खिळ्यांच्या काठ्या आणि थेट एके-४७ (AK-47)… या सगळ्याचा वापर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या निशस्त्र तरुणांवर—ज्यात बहुतांश विद्यार्थी आहेत—त्यांच्यावर केला जात आहे. हे विद्यार्थी फक्त परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी सरकारला उत्तरदायी धरून जाब विचारत होते.”
“हे तेच शासन आहे जे आज भारतावर राज्य करत आहे, पण त्यांना एका एका जिल्ह्याचा कारभारही व्यवस्थित चालवता येत नाहीये. गेल्या दशकभरात जगाने भारतात लोकशाहीचा संकोच होताना पाहिला आहे. आता देशातील या तरुणांनी दाखवून दिले आहे की, ते या राजवटीच्या क्रूरतेविरुद्ध आणि अपयशाविरुद्ध गप्प बसणार नाहीत.”
बिहारच्या पाटनामधील विद्यार्थ्यांवर एका पोलिस कर्मचाऱ्याने आंदोलनादरम्यान एके ४७ रायफल चालवल्याचे समोर आल्याने देशभरात पोलिसांविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सिवानमध्ये शनिवारी झालेल्या बिहार बंददरम्यान हवेत एके-४७ ने गोळीबार करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलीस मुख्यालयाने या घटनेची दखल घेतली आणि कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित केले. या कॉन्स्टेबलची ओळख अभिषेक पटेल अशी असून, तो एसआयटी (SIT) टीमचा सदस्य आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सिवानमधील गांधी मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक जमा होऊ लागले. त्यानंतर या आंदोलनाचे हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शहराच्या अनेक भागांमध्ये गोंधळ घातला, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि गांधी मैदान व जेपी चौकाजवळ पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत सिवानचे पोलीस अधीक्षक (एसपी) पुरण कुमार झा यांच्या पायाला दुखापत झाली. दगडफेकीत कर्तव्यावर असलेले अनेक पोलीस आणि पत्रकारही जखमी झाले.






