जांभोरी गावाला आदिवासी महिलांकडून बचत गटाकडून मधमाशी पालन उद्योग सुरु आहे (फोटो - istock)
मंचर : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जांभोरी गावाने विकासाची एक नवी दिशा पकडली आहे. जांभोरी गावाला भविष्यात “मधाचे गाव” म्हणून नवी ओळख मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत गावातील २० बचत गटांतील आदिवासी महिलांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २०० मधपेट्यांचे (बी बॉक्स) वाटप आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Nanded News)
या अभिनव उपक्रमाची बीजे २०२४ मध्ये रोवली गेली. ग्रामीण महिलांना शाश्वत रोजगार देण्याचा विचार पुढे आला. त्यानंतर खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने या प्रकल्पाचे नियोजन झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि १२ मार्च २०२६ रोजी या महत्त्वपूर्ण टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.
शेतीला मिळाला पूरक व्यवसायाचा आधार
मधमाशी पालन हा केवळ मध मिळवून देणारा व्यवसाय नसून, यामुळे पिकांच्या परागीभवनास मदत होऊन शेती उत्पादनातही वाढ होते. आदिवासी भागातील महिला आता स्वतःच्या हक्काच्या व्यवसायातून स्वावलंबी बनणार असून, हा प्रकल्प जांभोरी परिसराच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा सौत ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय
प्रशिक्षण आणि तांत्रिक सक्षमीकरण गरजेचे
महिलांना केवळ साहित्य देऊन न थांबता त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ३ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर येथील तज्ज्ञ मार्गदर्शक विद्या कांबळे आणि सुनील कांबळे यांनी महिलांना मधमाशी पालन, मध संकलन आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचे धडे दिले. जांभोरी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात उद्योजक रमेशभाऊ येवले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक गणेश कोकणे, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर, सरपंच प्रदीप आमुंडकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते मधपेट्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी किसन पारधी आणि अजय मुलुक यांनी विशेष परिश्रम घेतले.
हे देखील वाचा : मासिक पाळीमध्ये महिलांना पगारी रजा..! पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
जळाऊ सरपण साठा; वनविभागाची कारवाई
आंबेगाव तालुक्यातील शिनोली परिसरात विनापरवाना जळाऊ सरपण साठवून ठेवलेल्या वीटभट्टी मालकाविरोधात वनविभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे १५ घनमीटर जळाऊ सरपण जप्त करण्यात आले असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, शिनोली व त्याच्या सहका-यांनी मौजे शिनोली येथे शिनोली-उगलेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका वीटभट्टीवर पाहणी केली. या पाहणीदरम्यान वीटभट्टी परिसरात विविध वृक्ष प्रजातींचे मोठ्या प्रमाणात जळाऊ सरपण साठवून ठेवलेले आढळून आले. वनविभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत सुमारे १५ घनमीटर इतक्या प्रमाणात जळाऊ लाकूड विनापरवाना वाहतूक करून साठवून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. जप्त करण्यात आलेल्या सरपणामध्ये रायवळ जातीचे निलगिरी, कडुलिंब, बोर, करंज, अकेशिया, चिंच, पिपळ आणि उंबर या विविध वृक्षप्रजातींचा समावेश असल्याचे वनविभागाने स्पाट कल






