सातारा-देवळाईत पाणीटंचाई परिसरातील बोअरवेल कोरडया
नगरसेवकांनी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात ड्रमनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने टैंकर सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पाइपलाइनचे काम विलंबाने करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक
नो-नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा-देवळाई परिसरात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. येथील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे आर्थिक ताणही वाढत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या पाश्र्श्वभूमीवर प्रभाग २६ मधील नगरसेविका सविता कुलकर्णी यांच्यासह अप्पासाहेब हिवाळे, पद्मसिंग राजपूत आणि मौहन साळवे यांनी महापौर समीर राजूरकर तसेच आयुक्त जी. श्रीकांत यांना निवेदन दिले. त्यामध्ये सातारा-देवळाई भागातील पाइपलाइनचे काम संथगतीने सुरू असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सातारा-देवळाई परिसरात नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अपेक्षेपेक्षा मंद गतीने होत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून टँकरवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून तातडीने पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.






