जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बेकायदेशीर महाकाली कला केंद्र तात्काळ बंद; नियमभंगामुळे कारवाई
प्राप्त माहितीनुसार, चोराखळी येथील महाकाली कला केंद्रास परवानगी मिळण्यासाठी संबंधितांकडून यापूर्वी अर्ज करण्यात आला होता. मात्र, विविध विभागांकडून प्राप्त अहवालांच्या आधारे हा अर्ज प्रशासनाकडून नामंजूर करण्यात आला होता. तरीदेखील संबंधितांनी कला केंद्र सुरूच ठेवले होते. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही संबंधित कला केंद्र बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले.
धाराशिव येथील पोलीस अधीक्षक तसेच कळंबचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालांमध्ये या कला केंद्रात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यात भांडण-तक्रारी वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना तात्काळ कला केंद्र बंद करण्याचे आदेश दिले असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच तहसीलदार, कळंब, पोलीस निरीक्षक येरमाळा व इतर संबंधित अधिकाऱ्यांना संयुक्त कारवाई करून कला केंद्र बंद करण्याचे तसेच पंचनामा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच, प्रशासनाच्या आदेशानंतर चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर कारवाई होणार असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
राजभाऊ माळी यांनी कळंब तालुक्यात चोराखाली येथे महाकाली कला केंद्र सुरू करण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता, परंतु २८ एप्रिल रोजी अनुदानासाठीचा अर्ज जारी करण्यात आला, मात्र तो फेटाळण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी अहवाल पाठवला, त्यानुसार माळी यांनी महाकाली कला केंद्र हे अक्षय साळुंखे यांना चालवण्यासाठी भाडेतत्वावर दिले आहे. कला केंद्रात पारंपरिक वाद्यावर कला सादर करणे अपेक्षित असताना साउंड सिस्टीमवर सांस्कृतिक नृत्य करताना मिळून आलेले आहे.
कळंबच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. १२ जानेवारी २०२६ रोजीचा जिल्हाधिकाऱ्यांप्रति असलेला अहवाल, त्यांच्या मते, कला केंद्रामध्ये अनेक उल्लंघने आणि त्रुटी आढळल्या. कला केंद्राच्या इमारतीचे बांधकाम परवानाबाबत कोणतेही कागदपत्र दिसून आलेले नाहीत. प्रत्यक्ष पाहणीत सदर ठिकाणी अंदाजे 50 आर क्षेत्रावर कला केंद्राचे बांधकाम दिसून आले. प्रवेश व बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग नाहीत. नियमानुसार रंगमंच उभारलेला नसून रंगमंचावर कोणतीही व्यवस्था दिसुन आली नाही. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही.
परळमधील स्मारक कागदावरच! बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याची केली होती घोषणा






