छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनासाठी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा; अफवेमुळे 'पॅनिक बायिंग' सुरू
Chhatrapati Sambhajinagar: एकीकडे पेट्रोल, डिझेलसाठी शहर व जिल्ह्यातील पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत तर दुसरीकडे पुरेसा इंधनसाठा असल्याचा दावा प्रशासन करत आहे. इंधन संपण्याच्या भीतीने होत असलेल्या ‘पॅनिक बागिंग’ मुळे आणि पेट्रोल संपणारच्या अफेमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. शहर जिल्ह्यात रोजच हे चित्र दिसत असल्याने इंधन साठ्याबाबत वाहनधारकांत संभ्रम निर्माण होतो आहे.
मध्यपूर्व देशांमधील बुद्धामुळे निर्माण झालेली इंधन तुटवड्याची स्थिती आणखी चिघळत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम संभाजीनगर शहर जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेल साठा संपल्याने शहरातील काही पेट्रोल पंप मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी बंद होते. मात्र स्टॉक आल्याने पंप पुन्हा सुरळीत सुरु झाले, आता पेट्रोल संपणार या अफवेमुळे वाहनधारकांनी शहर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर गर्दी सुरु केली आहे. पंपांवर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तरी पेट्रोल मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
वाहनधारकांनी अतिरिक्त साठा करून ठेवू नये, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पेट्रोल डिझेलचे अपघात होऊ शकतात. याशिवाय साठा लवकर संवतो आणि इंधन नसल्याची अफवा पसरते. जितकी गरज असहे तितकेच इंधन भरावे.
– अखिल अबास, अध्यक्ष, पेट्रोल, डिझेल असोसिएशन)
सध्या शेतीची कामे सुरु आहेत. ट्रॅक्टर व इतर शेती वाहनांसाठी डिझेलचा वापर केला जातो. याशिवाय सध्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. ट्रॅक्टर, टुकद्वारे ही वाहतूक शेत ते कारखान्यापर्यंत होते. या वाहनांमुळे डिझेलची मागणी वाढते. त्यामुळे पंपावरील साठा लवकर संपतो. परिणामी दुसऱ्या पंपावर गर्दी होते, आणि माल मिळत नसल्याचा समज वाहनधारकांचा होत आहे.
इंधनचे वाढते दर आणि होणारा तुटवटा यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये इंधनचे दर आणखी वाढणार असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे मिळेल तितके इंधन भरून घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढला आहे. परिणामी बहुतेक पंप काही तासातच ड्राय होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक असून नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी बुधवारी केले.
पेट्रोल, डिझेल संपणार या भीतीमुळे वाहनधारक ‘पॅनिक बायिंग’ (भीतीने साठा करणे) करत आहेत. यासोबतच आता इंधन मिळणार नाही अशी भीती पसरली आहे. मात्र साठा सलग येत असून मागणीपेक्षा अधिकचे इंधन भरून घेतले जात असल्याने पंप लवकर ड्राय होत आहेत. पंप ड्राय झाल्याने ‘नो स्टॉक’चा बोर्ड लागतो आणि पेट्रोलचा तुटवडा असल्याचा समज वाहनधारक करून घेत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत. पंप चालक आणि पुरवठा कंपन्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे अब्बास महणाले.






