रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ संकुल प्राधिकरण मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी नेरळ गावातील ग्रामस्थांकडून सुरू होती.त्याचवेळी काँक्रिट रस्त्यावर लावण्यात आलेले फायबर गतिरोधक निघून गेल्याने वाहने सुसाट वेगात जात होती.ही बाब लक्षात घेऊन नेरळ गावातील रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यात यावर अशी मागणी स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या कडे केली होती.त्यानुसार या दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा परिषदेकडे पत्र व्यवहार केला आणि नेरळ संकुल प्राधिकरण कडून ही कार्यवाही व्हावी अशी मागणी केली.
त्यानंतर नेरळ संकुल विकास प्राधिकरण कडून दोन बोझर डांबर नेरळ मध्ये पोहचली. त्यात पहिल्या दिवशी नेरळ गावातील खांडा, मोहाची वाडी,बाजारपेठ,पाडा, टेप आळी,ग्रामपंचायत कार्यालय परिसर आदी भागातील रस्त्यावर एक बोझर चे माध्यमातून डांबर यांचा वापर खड्डे भरण्यासाठी आणि गतिरोधक बनवण्यासाठी झाला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेरळ पूर्व भागातील निर्माण नगरी,पाडा मातोश्री नगर आणि कोल्हार रस्त्यावर खड्डे भरण्याची आणि गतिरोधक बनवण्याची कामे पूर्ण करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्यासह कर्जत परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.त्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे,ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे,अतुल चांचें,तसेच संतोष सारंग,चिंधू बाबरे,रमेश पवार,प्रीतम गोरी,प्रवीण बाबरे,गुल्या चव्हाण, अंकिता मोरे,अंकिता मोरे,परेश सुर्वे,अक्षय चव्हाण,बाळू गुरव, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नेरळ प्राधिकरणाचे शाखा अभियंता जगताप तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.






