Maharashtra Breaking News, Marathi News Live Updates
Marathi Breaking news live updates : अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातून मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत तब्बल ११ जणांना शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ ऑक्टोबरच्या रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यातील पहिली धडक छापा टाकण्याची कारवाई ब्राह्मण सभा कॉलनी परिसरात झाली. येथील एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील पाच संशयित इसमांना शस्त्रांसह पकडण्यात आले.
03 Oct 2025 06:51 PM (IST)
Tourist Drowned: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर चार पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. तर एका पर्यटकाचा शोध सुरू आहे.
03 Oct 2025 06:19 PM (IST)
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवर मुंबई महानगरपालिकेने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरण हे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची मान्यता असून या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
03 Oct 2025 06:07 PM (IST)
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे राज्यातील विविध विभागांमध्ये भूकरमापक (Land Surveyor) पदांची एकूण 903 पदे भरण्यात येणार आहेत. या संधीमुळे अभियांत्रिकी व ITI धारक उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
03 Oct 2025 06:03 PM (IST)
चीनच्या एका न्यायालयाने एकाच कुटुंबातील ११ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. संपूर्ण कुटुंब एक गुन्हेगारी टोळी चालवत होते, खून ते फसवणूक, वेश्याव्यवसाय आणि मनी लाँड्रिंग अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये या कुटुंबाचा सहभागा होता. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे संगतमताने गुन्हेगारी कारवाया केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.
03 Oct 2025 05:46 PM (IST)
अमेरिकेचा शेजारील देश व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचा मोठा साठा आहे. येथे, एक लिटर पेट्रोल (पेट्रोल) ₹३ ला विकले जाते. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल सध्या लिबियामध्ये विकले जाते, जिथे एक लिटर किंमत ₹२.४३ आहे. त्यानंतर इराणचा क्रमांक लागतो, जो ₹२.५२ ला विकला जातो. याचा अर्थ तुम्हाला ₹२० ला सुमारे ८ लिटर पेट्रोल मिळू शकते. याचा अर्थ असा की एक लिटर पाण्याची किंमत ८ लिटर पेट्रोलइतकीच आहे.
03 Oct 2025 05:31 PM (IST)
मुंबई: रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ' गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही 'गोल्डन अवर' महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
03 Oct 2025 05:31 PM (IST)
भारतीय बाजारात फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने आपली नवी Citroen Aircross X SUV लाँच केली आहे. ही कार कंपनीच्या X-Seriesचा एक भाग आहे, ज्यामध्ये अलीकडेच लाँच झालेल्या Basalt X आणि C3Xचाही समावेश आहे. नवी Aircross X ही भारतीय कुटुंबांचा विचार करून डिझाइन करण्यात आली असून, यात स्टाईल, कम्फर्ट आणि इनोव्हेशन याचे उत्तम कॉम्बिनेशन साधण्यात आले आहे.
03 Oct 2025 05:06 PM (IST)
आशियाई बाजारातील संमिश्र कल दरम्यान, भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात म्हणजेच शुक्रवारी (३ ऑक्टोबर) अस्थिर व्यापारात सकारात्मक पातळीवर बंद झाला. नकारात्मक नोटवर उघडल्यानंतर, बाजाराच्या व्यवहारात चढउतार दिसून आले. गेल्या एका तासात झालेल्या खरेदीमुळे बाजार सकारात्मक नोटवर बंद झाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या धोरणात्मक निर्णयाबद्दलच्या सकारात्मक भावनेमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला.
03 Oct 2025 04:46 PM (IST)
देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारताच्या तीनही बाजूला समुद्रकिनारा आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अलर्टबद्दल जाणून घेऊयात.
03 Oct 2025 04:40 PM (IST)
जिंकुशाल इंडस्ट्रीज कंपनीने त्यांच्या आयपीओद्वारे ₹११६.१५ कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. आयपीओ २५ सप्टेंबर रोजी उघडला आणि २९ सप्टेंबर रोजी बंद झाला. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांची मोठी मागणी होती. संपूर्ण इश्यूसाठी एकूण सबस्क्रिप्शन ६५ पट होते.गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआय) भाग १४६ वेळा सबस्क्रिप्शन झाला, तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी भाग ४७ वेळा सबस्क्रिप्शन झाला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबी) कंपनीच्या आयपीओमध्ये ३६ वेळा सबस्क्राइब केले.
03 Oct 2025 04:35 PM (IST)
२६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मुख्यमंत्री महिला रोजगार योजना” सुरू केली. त्यावेळी ७.५ दशलक्ष महिलांना निधी हस्तांतरित करण्यात आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री कुमार म्हणाले की, त्यांचे सरकार महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करून बिहारच्या विकासासाठी काम करत आहे. याचदरम्यान ७५ लाख महिला लाभार्थींना डीबीटीद्वारे ७,५०० कोटी रुपये प्रति लाभार्थी १०,००० या दराने हस्तांतरित करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी डीबीटीद्वारे २५ लाख महिला लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी १०,००० या दराने २,५०० कोटी रुपये वर्ग केले. आतापर्यंत एकूण १०,००० कोटी रुपये १ कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.
03 Oct 2025 04:30 PM (IST)
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील नागरिकांना रस्ते, गटारी, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. या परिस्थितीस प्रस्थापित नगरसेवकच जबाबदार असल्याचा आरोप करत, समाजवादी पार्टीने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
03 Oct 2025 04:25 PM (IST)
कर्जत तालुक्यातील हालिवली गावात दसऱ्याच्या दिवशी काठी नाचवण्याची आणि ती मानाची काठी जमिनीत रोवण्याचा प्रथा कायम आहे.ही परंपरा गावातील असंख्य तरुणांनी कायम ठेवली आहे.
03 Oct 2025 04:20 PM (IST)
कल्याण आणि डोंबिवलीकर रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या ट्रॅफिकमुळे हैराण झालेत . खड्ड्यांबाबत गेला काही महिन्यात विरोधी पक्षांचा राजकीय पक्ष नागरिक सामाजिक संस्थांनी अनेक आंदोलन केली मात्र अद्यापही महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही पावसाने उघडीत देऊन दोन दिवस उलटले तरी खड्डे भरण्याची कामे संथ गतीने सुरू आहेत .या खड्ड्यामुळे अपघात वाढतायत नागरिकांना दुखापत होतेय .ढिम्म kdmc प्रशासनाला जागा करण्यासाठी कल्याण मधील हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेने दसऱ्याच्या दिवशीच रात्रीच्या सुमारास उपासत्मक आंदोलन केलं .
03 Oct 2025 04:15 PM (IST)
मालमत्ता करमाफी योजना बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करमाफी योजना’ या माध्यमातून सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सैनिकांप्रति आदर होता. त्याच अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट येण्यासाठी ग्रामविकास व नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले असून सरकारने सैनिकांचा सन्मान केला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सरकारने घेतला असल्याने, खोपोली शहर हद्दीतील आजी-माजी सैनिकांना एका मालमत्ता करातून सूट देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी यावेळी दिली.
03 Oct 2025 04:15 PM (IST)
माथेरान शहरात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विजयादशमी निमित्त हरहर चांगभले धनगर समाजाने मेळाव्याचे आयोजन केले. समाज बांधवांनी धनगरी नृत्य, गजानृत्य करून पर्यटकांचे लक्ष वेधले आणि या नृत्यांमुळे माथेरान शहरात आलेले पर्यटक देखील सहभागी झाले.माथेरानमध्ये धनगर समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विजयादशमी निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व भागातून मोठ्या प्रमाणावर धनगर समाज एकवटला.अध्यक्ष राकेश कोकळे,महिला अध्यक्षा संगीता ढेबे यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सर्वत्र सदानंदाचा जयघोष दुमदुमला. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. कर्जत,नेरळ,खालापूर तसेच आजूबाजूच्या सर्व गावांतील धनगर माथेरानमध्ये दाखल झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक येथून मिरवणुकीत सर्व सामील झाले.
03 Oct 2025 04:10 PM (IST)
आमच्या मागणी पूर्ण झाल्या नाही तर दिवाळीनंतर मंत्र्यांना पडू देणार नाही असा इशारा मनोज जारंगे यांनी दिला होता. यावर बोलताना मंत्री विखेंनी सांगितले, जरांगे पाटलांच्या भावनेचा आम्ही नेहमीच सादर केला आहे. बऱ्याच वर्षाची मागणी आपण पूर्ण केले आहेत. अजूनही सुरूच आहे. तर सरकार गंभीर असल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटल आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यातून भाजपवर निशाणा साधला. यावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांना दुसरं काही काम नसून कोणत्या वेळी काय राजकारण करावे याचे भान जर नसेल तर त्यावर काय बोलावं अशी खोचक टीका विखे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यापेक्षा ते राजकारण करणार असतील तर त्यांची बौद्धिक दिवाळखोरी म्हटलं पाहिजे, अशा लोकांची मला कीव येते असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे.
03 Oct 2025 04:03 PM (IST)
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जाऊन 13 वर्ष पेक्षा जास्त कालावधी झालाय. रामदास कदम हे त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते. उद्धवजींच्या आशीर्वादाने त्यांना पराभूत होऊन देखील त्यांना आमदार केला होता. १३ वर्ष हा विषय का काढला नव्हता. वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकलात. उद्धव बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे आहेत. बाळासाहेब असताना त्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करतायत. मग रामदास भाई तेरा वर्षे गप्प का होते? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
03 Oct 2025 04:01 PM (IST)
अंमली पदार्थ विरोधी पथक आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथकान केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी बजरंग सिंगला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एनएसजी चा कमांडो होता.
03 Oct 2025 03:53 PM (IST)
दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावा पार पडला आहे. मात्र यामध्ये शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत धक्कादायक दावा केला आहे.
03 Oct 2025 03:51 PM (IST)
कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्था सर्वांना जागा देते. परंतु सध्या, लोकशाही व्यवस्था सर्व बाजूंनी आक्रमण करत आहे. विविध परंपरा, धर्म आणि विचारांना एकत्र येण्यासाठी एक जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. सध्या भारतातील लोकशाही व्यवस्था मोठ्या हल्ल्याखाली आहे.” राहुल गांधी यांच्या विधानाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
03 Oct 2025 03:39 PM (IST)
फ्लेक्सिबल वर्कस्पेस ऑपरेटर WeWork India चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) शुक्रवारी (३ ऑक्टोबर) सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. गुंतवणूकदार मंगळवार, ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. कंपनीने प्रति शेअर ₹६१५-₹६४८ असा किंमत पट्टा निश्चित केला आहे.
03 Oct 2025 03:28 PM (IST)
IND vs WI 1st Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जात आहे. या सामन्यात भारताने आपले दोन्ही दिवस वर्चस्व कायम ठेवले असुन पहिल्या दिवशी गोलंदाजाने तर दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.
03 Oct 2025 03:18 PM (IST)
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी मे महिन्यात हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वपूर्ण खुलासे केले. या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने चार ते पाच एफ-१६ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली.
03 Oct 2025 03:07 PM (IST)
देशामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये विजयादशमी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रावण दहन करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी राजकीय टीका करणाऱ्या रावणाचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे.
03 Oct 2025 02:55 PM (IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एलन मस्कने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सर्व सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला. खरं तर मस्कने सोशल मीडियावर नेटफ्लिक्स विरोधात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सर्व युजर्स त्यांचे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन कॅन्सल करत आहेत. मस्कने अशी कोणती पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टनंतर लोकं त्यांचे नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शन का रद्द करत आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
03 Oct 2025 02:50 PM (IST)
ज्ञानाचा ग्रह असलेला गुरु ग्रह 19 ऑक्टोबर रोजी आपली राशी बदलणार आहे. यावेळी तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तो 4 डिसेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. गुरु ग्रहाच्या राशीबदलाचा परिणाम कोणत्या लोकांवर होईल. ज्ञानाचा ग्रह असलेला गुरु ग्रहाने 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.57 वाजता कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या राशीमध्ये तो 4 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. यानंतर देव गुरु बृहस्पति 4 डिसेंबर रोजी रात्री 8.39 वाजता मिथुन राशीत परत येईल.
03 Oct 2025 02:42 PM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कालपासून सुरू झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने या पहिल्याच सामन्यात मजबूत पकड धरली आहे. पहिला इनिंगमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खेळ खाल्लास केल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक ठोकले तर टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी खेळल्या. दुसऱ्या दिनाच्या दुसरा सेशन नंतर भारताच्या संघाने चार विकेट्स गमावून आत्तापर्यंत 96 ओवरचा खेळ संपला आहे. भारताच्या संघाने चार विकेट्स कमावून 326 धावा केल्या आहेत.
03 Oct 2025 02:35 PM (IST)
काल जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली. देशभरात संघाचा विजयादशमीचा उत्सव पार पडला. देशभरात पथसंचलन करण्यात आले. दरम्यान कॉँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. कॉँग्रेस नेत्याने संघाला दहशतवादी संघटना असे संबोधले. त्यामुळे या टीकेला भाजपने देकगीळ जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
03 Oct 2025 02:27 PM (IST)
शनिवारी आयसीसी महिला विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावरील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. यजमान संघ त्यांच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने चांगली गोलंदाजी केली, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि काही निष्काळजी विकेट्समुळे त्यांना संधी गमवाव्या लागल्या. नऊ फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला असूनही, त्यांना ४५.४ षटकांत २११ धावांवर बाद करण्यात आले.
03 Oct 2025 02:15 PM (IST)
पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दसऱ्याच्या सणाच्या गडबडीत चोवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीत बुधवारी (दि.२ ऑक्टोबर) संध्याकाळी लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लिफ्टच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
03 Oct 2025 02:07 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे दावे आता विनोदाचा विषय बनत आहेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग आता जागतिक नेत्यांमधील संभाषणांमध्येही येऊ लागले आहे. ट्रम्प यांनी जगभरातील सात युद्धे थांबवल्याबद्दल बढाई मारली होती, त्यासाठी नोबेल पारितोषिकाची मागणीही केली होती. अलिकडेच त्यांनी अल्बेनिया आणि अझरबैजानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. या टिप्पणीमुळे दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी ट्रम्प यांच्या भौगोलिक ज्ञानावर टीका केली, त्यांच्यासोबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन होते.
03 Oct 2025 02:00 PM (IST)
छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आणि आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प नवीन वर्षात १९ फेब्रुवारी २०२६ ला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
03 Oct 2025 01:50 PM (IST)
गुरुवारी (२ ऑक्टोबर) कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असलेल्या शेवरॉनच्या एल सेगुंडो रिफायनरीला आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. आग इतकी भीषण होती की ज्वाला उंच उसळताना दिसत होत्या. तथापि, माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.
03 Oct 2025 01:43 PM (IST)
गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने देशभरात कहर केला आहे. अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभगाने पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाचे सावट कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे.
03 Oct 2025 01:40 PM (IST)
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एक कफ सिरप मुलांसाठी घातक ठरले आहे. आतापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये ११ मुलांचा किडनी निकामी झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सामान्य सर्दी आणि तापानंतर देण्यात येणाऱ्या कफ सिरपमुळे या मृत्यूंना जबाबदार धरले जात आहे, ज्यामुळे आरोग्य विभागापासून ते पालकांपर्यंत सर्वांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे परिस्थिती विशेषतः गंभीर आहे. जिथे गेल्या १५ दिवसांत नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यास भाग पाडले आहे.
03 Oct 2025 01:40 PM (IST)
देशभरातून दररोज नव्या आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातून नव्या घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ३२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका स्थानिक लॉजिस्टिक्स कंपनीच्या संचालकाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार दाखल केली आहे.
03 Oct 2025 01:30 PM (IST)
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) अशांततेच्या दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा गणवेश, हेल्मेट आणि इतर उपकरणे फक्त १० रुपयांना विकली जात असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ त्या निषेधस्थळाचा असल्याचे म्हटले जात आहे जिथे नागरिक निषेध करत आहेत. हे निदर्शक पाकिस्तानी लष्कराची खिल्ली उडवताना ऐकू येतात की ते लष्कराचा गणवेश, हेल्मेट आणि ढाल १० रुपयांना विकतात.
03 Oct 2025 01:20 PM (IST)
गुरुवारी दसरा आणि गांधी जयंतीनिमित्त बाजार बंद होते. बुधवारी, आरबीआयने रेपो दर ५.५ टक्के ठेवल्यानंतर आणि ‘तटस्थ’ भूमिका राखल्यानंतर, सलग आठ दिवसांच्या घसरणीनंतर निर्देशांक वाढीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ०.८९ टक्क्यांनी वाढून ८०,९८३ वर आणि एनएसई निफ्टी ५० निर्देशांक ०.९२ टक्क्यांनी वाढून २४,८३६ वर बंद झाला. वाचा सविस्तर.
03 Oct 2025 01:10 PM (IST)
सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत. त्यामुळे अतिवृष्टी बाधितांसाठी 15 रुपयांची कपात केली जाणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दणका बसला आहे.अतिवृष्टीबाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे. 15 रुपयांपैकी 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना, 10 रु. मुख्यमंत्री सहायता निधीत जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघानं विरोध केला आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे.
03 Oct 2025 01:05 PM (IST)
ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे . आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक ( मुख्यालय) उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
03 Oct 2025 12:50 PM (IST)
या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये देशात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
03 Oct 2025 12:40 PM (IST)
विविध मागण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांकडून महापालिकेसमोर घोषणाबाजी करण्यात येत आहे. मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
03 Oct 2025 12:32 PM (IST)
यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिका तसेच एका नगरपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दहा पालिकेत 276 नगरसेवक राहणार असून यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग तर 58 नगरसेवक असणार आहेत. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे.
03 Oct 2025 12:00 PM (IST)
भारत आणि रशियातील मैत्री आतापासूनची नाही तर अनेक दशकांची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका भारताला रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणत आहे. भारताने मैत्री जपल्यानंतर रशियाने पाकिस्तानसोबत मोठा करार केला आहे. भारताने मोठा विरोध केल्यानंतरही रशियाने पाकिस्तानच्या JF-17 थंडर लढाऊ विमानांसाठी RD-93MA इंजिन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा या कराराला अगोदरपासूनच मोठा विरोध होता. हा करार पाकिस्तान आणि चीनमधील संयुक्त JF-17 चा एक भाग आहे.
03 Oct 2025 11:45 AM (IST)
गीतांजली अंग्मो यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेला पूर्णपणे चुकीचे म्हटले आहे. वांगचुक यांच्यावर एनएसए लादणे अन्याय्य आहे असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यांना ताबडतोब कोठडीतून सोडण्यात यावे असा या याचिकेत आग्रह धरण्यात आला आहे. त्यांच्या पतीच्या अटकेनंतर उचलण्यात आलेल्या या पावलाने कायदेशीर लढाईला एका नवीन वळणावर आणले आहे आणि देशव्यापी लक्ष वेधले आहे.
03 Oct 2025 11:30 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीका केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया किंवा बॅरिस्टर पै नाहीत. एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडचे ब्युरो चीफ आहेत. त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे, उद्या जेव्हा सरकार जाईल त्या बेनामी कंपंनीचं तेव्हा सगळ्या चौकश्या होतील. ते असं काल म्हणले की मराठी माणूस शिवसेनेमुळे, ठाकऱ्यांमुळे हद्दपार झाला. अशा प्रकारे जर वक्तव्य केलं असेल तर आधी आरशात पाहिलं पाहिजे. जे आमदार तुमच्यासोबत पळून गेले, शिवसेनेमुळे त्यांची किंमत 50-100 कोटी झाली, त्या मराठी माणसांची. सूरतला, गुवाहाटीला कोण पळून गेलं ? हे पळपुटे आहेत. काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला, लिहून दिलेली भाषणं वाचायची,
03 Oct 2025 11:15 AM (IST)
आता पुढे काय चमत्कार होणार आहे, की तुम्ही महापूजा ठेवली आहे. तीन महिन्यानंतर काय गेलेले पीक उभे राहणार आहे. इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर मी आयुष्यात पाहिला नाही. मुख्यमंत्री इतके बनावट आहेत की झेरॉक्स तरी बरी निघते. यांची झेरॉक्सच निधत नाही, अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
03 Oct 2025 11:02 AM (IST)
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे एका संन्यासी व्यक्ती करुन मोठा लढा दिला. स्वामी रामानंद तीर्थ ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर यांची आज जयंती. एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ हे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा रवा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. ७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्त्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली
03 Oct 2025 10:55 AM (IST)
भारतीय संघाचा माजी दिग्गज अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन सद्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळण्यासाठी तो सज्ज झाला. परंतु, त्याला आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये कोणताही खरेदीदार मिळू शकला नाही. लिलावादरम्यान, सहा संघांच्या फ्रँचायझींपैकी कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही. ILT20 मध्ये विक्री न झाल्यानंतर, अश्विनने आता मोठा निर्णय घेतला आहे.






