मुंबई- उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येत आहेत. परंतु भाजप (BJP) सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत, कारण ज्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत आहे, त्यामध्ये भाजपचे आणि शिंदे फडणवीस सरकारचे काही योगदान नाही. काही प्रकल्प आणि योजना काँग्रेसचे (Congress) सरकार असताना आणि महाविकास आघाडी सरकार (MVA) सत्तेत असताना मंजूर करून काम सुरू केले गेले आहे. शिंदे फडणवीस सरकार हे 50 खोके सरकार आहे, अवैधरीत्या व बेकायदेशीर सरकार आहे आणि हे सर्व जनतेला माहित आहे. अशी टिका मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली आहे.
[read_also content=”दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार, एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती; प्रकल्प लवकर सुरु होतील- मुख्यमंत्री https://www.navarashtra.com/maharashtra/one-lakh-thirty-seven-thousand-crore-investment-mou-creation-of-more-than-one-lakh-jobs-in-davos-world-economic-conference-projects-will-start-soon-cm-information-362664.html”]
दरम्यान, आगामी मनपा निवडणुक आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे फडणवीस सरकारला कोणी मते देणार नाही, त्यांचा पराभव अटळ आहे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. म्हणून ते सर्व निवडणुका पुढे ढकलत आहेत आणि म्हणूनच फक्त प्रसिद्धीसाठी आणि जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. भाई जगताप पुढे म्हणाले की, मुंबईतील मेट्रो प्रकल्प व योजना काँग्रेसचे सरकार असताना आम्ही सर्व मंजूर करून काम सुरू केले, निधी उपलब्ध केला आणि आता हे भाजप सरकार श्रेय घेत आहेत. भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारचे काहीच योगदान नाही.
400 किलोमिटर रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्प टेंडर प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. नरेंद्र मोदी उद्या उद्घाटन करत असलेल्या विकास कामांसाठी मनपाने सुमारे 6500 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेत कोणाचे ही सरकार नाही, प्रशासक नेमलेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस मनपा चालवत आहेत. एखाद्या प्रशासकाला सुमारे 6500 कोटीचा निधी मंजूर करण्याचा अधिकार कोणी दिला? असा माझा सवाल आहे आणि यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे, असा माझा आरोप आहे.
भाई जगताप पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्या येणार आहेत म्हणून दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत बांद्रा व सांताक्रुझ परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. त्या परिसरातील कार्यालये दुपारी 12 वाजता बंद करायला सांगितले आहे, तसे आदेश व नोटिसा सरकार, प्रशासन व पोलिसांनी काढल्या आहेत. हा मुंबईकरांना नाहक त्रास आहे. मुंबईकरांना का वेठीस धरण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा मुंबईकरांना त्रासदायक का व्हावा? असे भाई जगताप म्हणाले.