वादळ वारा अन् विजा...! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट
विशेष म्हणजे, 8 जूनपासून मृग नक्षत्राची सुरुवात झाली आणि त्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पावसाची सुरुवात वेळेवर झाल्याने आता शेतकरी शेतीच्या कामांना वेग देण्याच्या तयारीत आहेत. भात लागवड, नांगरणी आणि इतर शेतीपूर्व कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. कोकणात सक्रिय झालेला मान्सून आता मुंबईच्या दिशेने सरकत असून आज मुंबईतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
Success Story : राजुरीच्या लेकीची मोठी झेप! अवघ्या २० वर्षी अमेरिकेत कर्मशियल पायलट म्हणून भरारी
दरम्यान, महाराष्ट्रात आज (9 जून) वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 25 ते 30 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागात मान्सून अधिक सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच वादळी वाऱ्यांदरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत, मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये, तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या अनेक भागांमध्ये दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा आणि अरबी समुद्राच्या प्रदेशातील सक्रिय चक्रीवादळी स्थिती आणि विविध द्रोणी प्रणालींमुळे पावसाला चालना मिळत आहे. परिणामी, कोकण, किनारपट्टीचे प्रदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत मोसमी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पुण्यातील लोकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. विशेषतः संध्याकाळच्या पावसामुळे दिलासा मिळेल.






