मुंबई आयटी आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना औषध साठा पोचवण्यात येणार आहे. यासाठी ड्रोनची मदत मिळणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
उपनगर पोलिसांनी यातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक केली असून, न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 6 जानेवारी रोजी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरची पिकासाठी हानीकारक ठरला. या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते. त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रम राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. आज नंदुरबार शहरात बाईक रॅली आणि डीजिटल व्हॅनचा शुभारंभा करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. शरद पवार गटाला नंदूरबारमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाराज नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांवर आरोप करत सामूहिक राजेनामे दिले आहेत.
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास डॉ. गावित इच्छुक होत्या. मात्र, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुती एकत्रित तयारी करत आहे. मात्र भाजप पक्षातील काही नेत्यांची शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर माजी मंत्री असलेल्या भाजप नेत्याने जहरी टीका केली असून थेट मुख्यमं...
मुहम्मद पैगंबर यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र ईदच्या जुलूसवेळी नंदुरबारमध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झाला. आणि तुंबळ हाणामारी झाली. याचे व्हिडिओ आणि फोटो देखील काढण्यात आले. दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. मात्र अफवा पसरवण्यावर कडक का...
नंदुरबादमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन बालिकाचे अपहरण करून तिचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणासंदर्भात 13 सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस पथकाने तात्काळ संशयीत आरोपीस ताब्यात घेतले.
रोजगार शोधण्याची वेळ मतदार संघातील नागरिकांवर आल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व मतदार संघातील मूलभूत समस्यांच्या पाढा वाचला.अनेक नागरिकांना कर्जमाफीचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या योजना सुरू आहेत, त्यांचा लाभ मिळण्यातही उशीर होत आहेत. इतकेच नव्हे तर ...
राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून महायुतीकडून याचा जोरदार प्रकार केला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या योजनेच्या प्रचार खर्चावरून सरकारवर टीका केली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी या योजनेवरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.