गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! 'मृत्युदूत' बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई
मुंबईतील गिरगाव भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, याच हतबलतेचा गैरफायदा घेत गिरगावात टँकर माफियांचा उच्छाद वाढला असून, हे टैंकर चालक नागरिकांच्या जीवाची कवडीचीही पर्वा करत नसल्याचे समोर आले आहे. अनेक टँकरचालक चक्क दारूच्या नशेत सुसाट वाहने चालवत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या गिरगावकरांनी आता थेट प्रशासनालाच धारेवर धरले असून, दारू पिऊन टैंकर चालवणारे चालक काय जनतेनेच शोधून आणि पकडून द्यायचे का? महापालिका, पोलिस आणि आरटीओ विभाग काय फक्त नावापुरता उरला आहे का, असा सवाल विचारला आहे.(फोटो सौजन्य – AI)
CNG Price Hiked : मुंबईत CNG च्या दरात पुन्हा वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला गॅस
तीन वर्षांपूर्वी गिरगावच्या सिक्कानगर भागात एका बेदरकार टैंकर चालकाने एका निष्पाप महिलेला चिरडल्याची TERTANK थरारक घटना घडली होती. या भीषण अपघाताच्या काळ्या आठवणी अजूनही गिरगावकरांच्या मनात ताज्या आहेत. असे असतानाही, आज पुन्हा एकदा गिरगावच्या रस्त्यांवर हे टैंकर ‘मृत्यूदूत’ बनून धावत आहेत. मुजोर टैंकर चालक आणि बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणारे टैंकर मालक यांच्यावर मुंबई महापालिका आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, असा सवाल ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
या मुजोर टैंकर चालकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गिरगावकरांनी दिला आहे. आता यावर पालिका आणि पोलिस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अवैध पाण्याचा उपसा आणि भरधाव वेगाने धावणारे टैंकर उघड्या डोळ्यांनी पाहूनही पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का आहे? यावरून, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं म्हणत पालिका प्रशासन आणि टैंकर माफियांचे साटेलोटे तर सुरू नाही ना? अशी शंका येथील नागरिक ज्ञानंद कवठणकर यांनी व्यक्त केली जात आहे.
नियमांतर्गत कामावर रुजू करून घेतले जाते, यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मागवण्यात आली आहे. तसेच नशेत गाड्या चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी आणि जलद तोडगा काढण्यासाठी आम्ही लवकरच वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे साहाय्यक आयुक्त यांच्यासोबत एक विशेष संयुक्त बैठक घेणार आहोत, असे मत स्नेहल तेंडुलकर, नगरसेविका यांनी व्यक्त केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईचा बडगा उगारला आहे. बेदरकारपणे टैंकर चालवणाऱ्या रणजीत यादव या टँकरचालकावर पोलिसांनी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ (दारू पिऊन वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याचा वाहनचालक परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.






