एप्सटिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव म्हणून प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ
पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भारताला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्चे तेल आणि लिक्विफाइड नेचरल गैसची आवश्यकता होती. अमेरिका-इराण युद्धादरम्यान त्यांचा मुबलक पुरवठा होता, पण आता युद्ध संपल्यानंतर या दोन्हींची कमतरता भासत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा इटलीचा होता. त्यांच्या दौऱ्याचे कारण असे होते की, इटलीने भारताकडून येणारी चार जहाजे थांबवली होती. या जहाजांमधून अंदाजे ८०० टन लष्करी दर्जाचे पोलाद नेले जात होते. हे पोलाद इस्रायलला जाणार होते. जर हा माल इस्रायलमध्ये पोहोचला, तर त्याचा उपयोग अंदाजे १७,००० तोफगोळे बनवण्यासाठी केला जाईल, जे गाझा पट्टीत वापरले जातील.इटालियन बंदरावरील कामगार संघटनांनी ही जहाजे थांबवण्यासाठी इटालियन सरकारवर दबाव आणला आहे. हे लष्करी पोलाद भारतातून इस्रायलला नेले जात आहे. जेव्हा इराणला हे समजले, तेव्हा त्यांनी भारताला होणारा तेलपुरवठा कमी केला. ही गोष्ट जगाला कळू नये म्हणून पंतप्रधान मोदी इटलीला गेले आहेत. एपस्टाईन फाईल्समध्ये पंतप्रधान मोदींचे नाव आल्यानंतर प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकत आहे,” असे ते म्हणाले.
“पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी,” छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
ते पुढे म्हणाले, “लोकांनी पंतप्रधान मोदींना विचारायला हवं की त्यांनी देशाचं परराष्ट्र धोरण का बदललं. आणि आणखी एक प्रश्न विचारला पाहिजे: एपस्टाईन फाईलमध्ये तुमच्या नावाव्यतिरिक्त आणखी काही आहे का? भारताला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्चे तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूची आवश्यकता होती. अमेरिका-इराण युद्धाच्या काळात यांचा मुबलक पुरवठा होता. मात्र, युद्ध संपल्यानंतर आता या दोन्हींची कमतरता भासत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.






