सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासू मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अश्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या नोटीसमुळे पक्षात आणि राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
9 जुलै रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सच्चिदानंद सिंह यांनी केली आहे. त्यांच्या मते, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे.
‘कॉकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
या प्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये नवीन निवडणूक होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी अमान्य मानावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित झाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या नोटीसमुळे पुढील काळात पक्षाची भूमिका काय असेल आणि या मागणीवर काय निर्णय घेतला जाईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या चारचा सातत्याने रंगात आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या हयात असतानादेखील मोठ्या प्रमाणात या चर्चा होत होत्या.
नुकतेच अधिवेशन काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात भेट घेतल्याने या चर्चाना आणखी जोर चढू लागला. यावर मात्र शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल वक्तव्य करत ‘आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जाते. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय,’ असं म्हणतत्यांनी राजकीय अफवांवर उपरोधिक भाष्य केले.






