World Poha Day 2026: सुदामाच्या पोटलीपासून ते इंदौरच्या रस्त्यांपर्यंत, जाणून घ्या भारताच्या आवडत्या नाश्त्याची रंजक कहाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
World Poha Day 2026 : भारतात सकाळी उठल्यावर बहुतांश घरांमध्ये एकच प्रश्न विचारला जातो, “नाश्त्याला काय आहे?” आणि त्याचे उत्तर बहुधा “पोहे” हेच असते. महाराष्ट्रातील ‘कांदा-पोहे’ ( navarashtra special) असो किंवा मध्य प्रदेशातील ‘शेव-जिलेबी-पोहे’, हा पदार्थ केवळ भूक भागवत नाही तर तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज ७ जून, म्हणजेच ‘जागतिक पोहा दिन’. या निमित्ताने आपण ज्या पोह्यांना दररोज चवीने खातो, त्यांचा हजारो वर्षांचा रंजक इतिहास आणि विज्ञानाच्या दृष्टीने असलेले त्यांचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
पोह्यांचा इतिहास हा केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित नसून तो महाभारताच्या काळापर्यंत मागे जातो. पौराणिक कथेनुसार, जेव्हा गरीब सुदामा आपला मित्र भगवान श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला गेला होता, तेव्हा त्याच्याकडे देण्यासाठी काहीही नव्हते. त्याच्या पत्नीने त्याला केवळ एका जुन्या कापडात बांधलेले ‘पोहे’ दिले होते. श्रीकृष्णाने ते पोहे इतक्या आवडीने खाल्ले की, तेव्हापासून पोहे हे साधेपणा आणि निस्सीम प्रेमाचे प्रतीक बनले. प्राचीन काळी तांदळाची साठवणूक करण्यासाठी त्याला अर्धवट उकडून चपटे केले जात असे, ज्याला पुढे ‘पोहे’ हे नाव मिळाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली
पोह्यांचा प्रवास हा राजेशाही इतिहासाशीही निगडित आहे. असे मानले जाते की, पोह्यांचा उगम प्रामुख्याने महाराष्ट्रात झाला. जेव्हा होळकर आणि शिंदे घराण्यातील राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून मध्य भारतात स्थलांतर केले, तेव्हा त्यांनी ही पोह्यांची चव इंदूर आणि ग्वाल्हेरमध्ये नेली. पेशवे आणि मराठा सैन्यासाठी पोहे हे एक उत्तम प्रवासाचे अन्न (Travel Food) होते, कारण ते कोरडे असल्याने बराच काळ टिकायचे आणि बनवायलाही सोपे होते. आज इंदूरला जी ‘पोह्यांची राजधानी’ म्हटले जाते, त्याचे श्रेय या ऐतिहासिक स्थलांतराला जाते.
इंदूरमध्ये आज दररोज सुमारे ९० टन पोहे खाल्ले जातात, पण ही परंपरा सुरू करण्याचे श्रेय पुरुषोत्तम जोशी यांना जाते. स्वातंत्र्यानंतर १९४८-४९ च्या सुमारास ते रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातून इंदूरला गेले. तिथे त्यांनी ‘उपहार गृह’ नावाने छोटे दुकान सुरू केले आणि पोह्यांची विक्री सुरू केली. त्यांच्या या साध्या चवीने इंदूरच्या लोकांच्या मनावर इतकी मोहिनी घातली की, आज इंदूरमध्ये पोहे-जिलेबी हा तिथला स्वाक्षरी पदार्थ (Signature Dish) बनला आहे.
आज विश्व पोहा दिवस है। विश्व की पोहा राजधानी इंदौर से इस दिवस को मनाने की शुरुआत हुई थी। सात जून को विश्व पोहा दिवस मनाने के पीछे विख्यात कलाकार राजीव नेमा जी की सोच है। देश के अलग-अलग हिस्सों में पोहा अपने ढंग से खाया जाता है। चपटा चावल-पोहे को देश के हर कोने में अलग-अलग… pic.twitter.com/DfLUVTxyxo — Akhilesh Sharma (@akhileshsharma1) June 7, 2026
credit – social media and Twitter
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, स्वतंत्र भारतात पोह्यांच्या उत्पादनावर एकदा बंदी आली होती. १९६० च्या दशकात भारतात अन्नाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा तांदळाचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने तांदळापासून पोहे तयार करण्यावर काही काळ बंदी घातली होती. मात्र, पोह्यांची लोकप्रियता इतकी होती की, ही बंदी फार काळ टिकली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण
पोहे केवळ जिभेचे चोचले पुरवत नाहीत, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत:






