विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना काल गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताला २ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात २५ ऑक्टोबर रोजी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला आणि दूसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आगहडी घेऊन मालिका जिंकली आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारताच्या दिग्गज खेळाडू विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. कोहली मागील दोन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे पुढील सामन्यावर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. सोबत, तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर त्याने विराट कोहलीने ‘ती’ गोष्ट साध्य केली, तर दोन वेळा शून्यावर बाद झालेला विराट कोहली विस्मरणात जाऊन, तो पुन्हा कौतुकात सामील होणार आहे आणि कोहली हे करू शकतो कारण, विराट कोहलीची कामगिरी बघता तो ही सहज साध्य करू शकतो.
जर माजी कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यात काही धावा काढण्यात यश मिळवले असते तर त्याला विक्रमाजवळ पोहचण्यास अधिक मदत झाली असती. परंतु विराट कोहली पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भोपळा देखील फोडू शकला नाही. आता तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने जर ५४ धावा केल्या तर कोहलीसाठी हा आकडा त्याला एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचवेल.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून या मालिकेतील एक सामना बाकी असून या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात येणार आहे. दरम्यान भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यासोबतच टी-२० मालिकेसाठी हे बदल करण्यात आले






