भारतीय संघाची घोषणा (फोटो- सोशल मीडिया)
बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग तीन पराभव झाले तरी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
🚨 News 🚨#TeamIndia squad announced for the 3️⃣-match T20I series against Zimbabwe. More Details ▶️ https://t.co/sC19D5eW8y#ZIMvIND pic.twitter.com/ctbM5gFMtY — BCCI (@BCCI) July 6, 2026
झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. तर या सिरिजमध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने देखील आपली जागा कायम ठेवली आहे.
भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग






