हरमनप्रीत कौर आणि एलिसा हीली(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ‘मला आधीच खलनायक बनवल…’ मोहम्मद शमीची BCCI सोबत टक्कर;पुनरागमनाबद्दलच्या विधानाने खळबळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ६० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने ११ जिंकले आहेत आणि ४९ गमावले आहेत. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या २८ एकदिवसीय सामन्यांपैकी २३ सामने आपल्या नावे केले आहेत.
दक्षिण आफ्रिका २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पहिला अंतिम संघ बनला आहे. दुसरा अंतिम संघ आता नवी मुंबईत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याद्वारे निश्चित होणार आहे. त्यामुळे या सामन्यात जो जिंकेल त्याला अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे.
आज सकाळी मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तथापि, भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू होईपर्यंत पावसाची शक्यता फक्त २०% असणार आहे. संध्याकाळी ही शक्यता आणखी कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानण्यात येते. फलंदाजांना येथे मदत मिळत आली आहे. या खेळपट्टीचा फायदा फिरकीपटूंना देखील होतो. आज आपल्याला उच्च-स्कोअरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.






