आयर्लंडकडून भारताचा दारुण पराभव (फोटो- ians)
भारत अन् आयर्लंडमध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. आयर्लंडने पहिला सामना 34 रन्सने तर दूसरा सामना केवळ 1 रन्सने जिंकला आहे. त्यामुळे भारताचा 2-0 असा पराभव झाला आहे. यावर आता आर. अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.
IND vs IRE: भारतीय संघाने घालवली लाज, आयर्लंडने रचला इतिहास; 3 दिवसात 2 पराभव
काय म्हणाला आर. अश्विन?
भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे. तिथे फटके मारणे सोपे असते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करताना अडचण येऊ शकते. तिथल्या खेळपट्टी आयपीएलच्या खेळपट्टीप्रमाणे चांगल्या नव्हत्या. भारतीय फलंदाजीतील अनेक खेळाडू आयपीएलमधील आले आहेत. जेव्हा ते इंटरनॅशनल क्रिकेट खेळतील तेव्हा त्यांची खरी कसोटी असणार आहे.
भारतीय संघाने घालवली लाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अशी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. क्रिकेटमधील महासत्ता मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला आयर्लंडकडून टी-२० मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. आयर्लंडने केवळ शानदार कामगिरी करत भारतीय संघाला पराभूत केले नाही, तर मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत क्रिकेट इतिहासात एक नवीन सुवर्ण अध्याय लिहिला.
IND vs ENG: नव्याने सुरूवात! आता इंग्लंडला भिडणार Team India, पूर्ण शेड्युलची लिस्ट
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. या ऐतिहासिक विजयाने आयर्लंड संघाने हे सिद्ध केले की आधुनिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला कमी लेखणे महागात पडू शकते. आयर्लंडने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ९ गडी गमावून केवळ १५३ धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला. आयर्लंडने ही मालिका २-० ने जिंकली. यावेळीदेखील वैभव सूर्यवंशीला डावलले.






