हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात? (फोटो- ians)
हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात
माजी क्रिकेटपटू सदागोपान रमेश यांनी सुनावले खडेबोल
मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव
Mumbai Indians: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सणे हंगामाची सुरुवात चांगली केली होती. तब्बल 12 वर्षांनी मुंबईने पहिला सामना जिंकला होता. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली आहे. सलग तीन सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटर सदागोपान रमेशने हार्दिक पंड्या खडेबोल सुनावले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीचे खापर हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपान रमेशने विधान केले. मुंबईच्या पराभवाचे कारण त्याने हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे. आरसीबी विरुद्ध हार्दिक पंड्याने केलेल्या नेतृत्वावर त्याने टीका केली आहे.
सदागोपान रमेश यांनी जसप्रीत बुमराहला बऱ्याच वेळ बॉलपासून दूर ठेवणे चुकीचे म्हटले आहे. त्यांनी हार्दिक पंड्याच्या रणनीतीवर टीका केली आहे. बाकीचे गोलंदाज भरपूर रन्स देत असताना पॉवर प्लेमध्ये बुमराहला केवळ 2 च ओव्हर टाकायला देणे व खूप वेळ त्याला बॉलपासून दूर ठेवणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
“सर्वांनी आपल्या खोलीत जावे आणि…”; RCB विरुद्ध पराभव होताच Hardik Pandya काय म्हणाला?
आरसीबीच्या विरुद्ध हार्दिक पंड्याने केलेल्या रणनीतीवर सदागोपान रमेश यांनी चुकीचे म्हंटले आहे. रजत पाटीदार विरुद्ध मयंकला गोलंदाजी देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. हा निर्णय मुंबई इंडियन्सला फटका देणारा ठरला आहे. मैदानावर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा देखील पंड्याच्या निर्णयावर समाधानी दिसले नसल्याचा डावा सदागोपान रमेश यांनी केला आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्या पुढील सामन्यात कसे नेतृत्व करतो, हे पहावे लागणार आहे. पुढील सामन्यात देखील मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर हार्दिक पंड्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
RCB विरुद्ध पराभव होताच Hardik Pandya काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सचा आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया पोस्टवर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकतर आपण जिंकू शकतो किंवा पराभव झाल्यास त्यातून काहीतरी शिकू शकतो.
महेला जयवर्धने म्हणाले त्यानुसार, ते बघून मला असं वाटतं की आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, आपण सर्वांनी आपल्या खोलीत जावं आणि नेमकी चूक कुठे झाली याचा विचार करावा. मला माहित आहे की हे कठीण आहे. पराभव नेहमीच त्रासदायक असतो. पण आपल्याला आपल्या चुकांमधून शिकावे लागेल. एकतर आपण मॅच जिंकतो किंवा त्यातून काहीतरी शिकतो. पराभूत होणं हा कधीच पर्याय नसतो.






