भारत अ विरुद्ध श्रीलंका अ (फोटो- ट्विटर)
ट्राय सिरिजमध्ये भारत अन् श्रीलंका आमनेसामने
प्रथम फलंदाजी करताना भारताने केल्या २६५ रन्स
सदिरा समरविक्रमाने केली ९३ रन्सची खेळी
India A Vs Sri Lanka A Live Updates: श्रीलंकेत सध्या भारत, श्रीलंका आणि अफगणिस्तानमध्ये ट्राय सिरिज सुरू आहे. आज या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. भारताने आजच्या सामन्यात सुयश शेडगेच्या खेळीच्या जोरावर भारताने २६५ रन्स केल्या. भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिल होते. अखेर शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना कोण जिंकणार हे समजून येत नव्हते. अखेर या सामन्यात सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत केले आहे.
श्रीलंकेची फलंदाजी
भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे २७ आणि ३२ रन्स करून आउट झाले. त्यानंतर विशेन हालंबागे आणि सदिरा समरविक्रमाने श्रीलंकेचा डाव सावरला. सदिरा समरविक्रमाने भारताविरुद्ध ९३ रन्सची दमदार खेळी केली. त्यानंतर आलेले श्रीलंकचे खेळाडू चांगली फलंदाजी करू शकले नाहीत.
भारताची फलंदाजी
भारताकडून प्रभसिमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशीने सुरुवात केली. मात्र या सामन्यात देखील दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. वैभव सूर्यवंशी २१ रन्स करून आउट झाला. तर प्रभसिमरन केवळ ११ रन्सवर आउट झाला. तर त्यानंतर तुतुराज गायकवाडने ३७ रन्सची लहानशी खेळी करून भारताला सावरले. कर्णधार तिलक वर्मा २३ रन्स करून आउट झाला. आयुष बडोणी आणि निशांत सिंधु हे देखील चांगली खेळी करू शकले नाहीत. सुयश शेडगेने मात्र भारताला सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यात मदत केली. त्याने ७२ रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली. तर विप्रज निगमने शानदार अर्धशतक लगावले. तो ५१ रन्स करून आउट झाला.
सुपर ओव्हर
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला १७ रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर भारत सुपर ओव्हरमध्ये केवळ पराभूत झाला आहे.
Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू
वैभव सूर्यवंशी अपयशी
आयपीएल २०२६ मध्ये ७०० हून अधिक धावा करून आपली पहिली मालिका खेळणारा वैभव सूर्यवंशी सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो १४ चेंडूंमध्ये २१ धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंग, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्मा हे देखील स्वस्तात बाद झाले. संघाची धावसंख्या ७ गडी बाद १४३ असताना, विप्राज निगमने (४९ चेंडूंमध्ये ५१ धावा) सूर्यांश शेडगेसोबत (६६ चेंडूंमध्ये ७२ धावा) इंडिया ‘अ’ संघाचा डाव सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आठव्या विकेटसाठी १०४ धावा जोडून इंडिया ‘अ’ संघाची धावसंख्या २६५ पर्यंत पोहोचवली.






