वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…
अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्त केल्यानंतर अनेक स्तरावरुन टीका करण्यात आली. आता या टिकेवर पूर्व विभागाच्या निवड समिती सदस्यांपैकी एक आणि ओडिशाचा माजी रणजी खेळाडू प्रबंजन मलिक यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रबंजन मलिक म्हणाले की, ‘ त्याला कर्णधार म्हणून नव्हे, तर केवळ उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. संघाचा कर्णधार ईशान किशन आहे. ईशान एक यष्टीरक्षक आहे जो दिवसभर मैदानावर सक्रिय असतो आणि खेळाच्या रणनीतीमध्ये सहभागी असतो. वैभव दिवसभर संघाचे नेतृत्व करेल हे पूर्णपणे स्पष्ट नाही. वैभव जसजसा प्रगती करत आहे, तसतसा तो अधिक परिपक्व होत आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याला अधिक जबाबदारी दिल्याने एक खेळाडू आणि लीडर म्हणून त्याची प्रगती होण्यास मदत होईल.’
मलिक पुढे म्हणाले की, निवड समितीला वैभवमध्ये भविष्यातील भारतीय कर्णधाराची क्षमता दिसते. ते म्हणाले, ‘कोणास ठाऊक? आम्हाला आशा आहे की तो एक दिवस भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार होऊ शकेल. वैभवला उपकर्णधार बनवण्यामागे हीच प्रेरणा होती.’
पूर्व विभागीय निवड समितीच्या मते, वैभवसाठी कर्णधारपद किंवा उपकर्णधारपद नवीन नाही. त्याने यापूर्वीही अशा भूमिका यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मलिक यांनी आठवण करून दिली की, वैभव त्याच्या घरच्या संघ, बिहारसाठी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये उपकर्णधार आहे. इतकेच नाही, तर २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याने भारतीय संघात उपकर्णधारपदाची भूमिका निभावली आहे.
निवड समितीने वैभवला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली होती का, हे उघड करताना प्रभंजन मलिक म्हणाले की, ‘ नाही, त्याच्याशी आधी कोणतीही चर्चा झाली नव्हती. हा पूर्व विभागातील सर्व राज्यांच्या निवड समितीने घेतलेला सामूहिक निर्णय होता. आम्हाला खात्री आहे की वैभवमध्ये जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे आणि गरज पडेल तेव्हा संघाचे नेतृत्व करण्यास तो पूर्णपणे सक्षम आहे.’
वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?






