वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याला विचारण्यात आले की, असा कोणता गोलंदाज आहे ज्याच्याविरुद्ध फलंदाजी करायला त्याला भीती वाटते. वैभवने जराही न डगमगता उत्तर दिले की, ‘सध्या तरी तसा कोणी नाही. ‘ सध्या सोशल मीडियावर वैभवचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने केवळ १६ सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या. त्याने केएल राहुल, ईशान किशन, विराट कोहली, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकून ऑरेंज कॅप जिंकली. या काळात त्याने जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची धुलाई केली.
वैभव सूर्यवंशीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २०२६-२७ च्या दुलीप ट्रॉफीसाठी त्याची पूर्व विभागीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. या संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक आणि घातक फलंदाज ईशान किशन भूषवणार आहे. संघात स्थान मिळालेला वैभव हा बिहारमधील एकमेव खेळाडू आहे. तो अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सुरुवात करू शकतो, असे मानले जात आहे. मात्र, इतक्या लहान वयात वैभवची उपकर्णधारपदी झालेली नियुक्तीमुळे काही स्तरावरुन टीकाही केली जात आहे.
पूर्व विभागाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार गोलंदाजीचे नेतृत्व करतील. अष्टपैलू खेळाडू शहबाज अहमद, विराट सिंग, कुमार कुशाग्र, अनुकूल रॉय आणि दानिश दास यांचाही संघात समावेश आहे. मात्र, रियान पराग आणि आकाशदीप यांना दुखापतीमुळे संघात स्थान देण्यात आले नाही. शस्त्रक्रियेनंतर दोघेही सध्या रिहाब प्रक्रियेतून जात आहेत.
हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक






