मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर आणि गडचिरोलीला 'इंडस्ट्रियल मॅग्नेट' म्हणून घोषित केले. खनिज विकास निधीतून या भागात दीड लाख रोजगार निर्माण करण्याची त्यांची योजना आहे.
लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांसमोर आणि मुख्य रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ केलेल्या तपासणीत गंभीर नियमभंग उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना ‘कोंडून’ वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले आहे.
शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता पैशाचे सोंग करता येत नाही असे एका शेतकऱ्याला म्हणाले होते. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे.
नांदणी मठ आणि गावकरी गेल्या काही महिन्यांपासून माधुरी हत्तीणीच्या घरवापसीची प्रतीक्षा करत आहेत. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या सुनावणीत सकारात्मक घडामोड घडली आहे.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हप्तेखोर, जातीयवादी असून खोटे गुन्हे दाखल करतात, असे गंभीर आरोप करत त्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
गणपती उत्सवात झेंडूला शंभर रुपये किलो दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले होते, परंतु नवरात्राच्या तोंडावरच झेंडूच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्यासोबतच्या इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता हाके यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाच दिवस उलटले आहेत. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होऊन शासनाचे लक्ष वेधले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केला आहे. या टीकेवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं…