दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या तलावातील माती आणि मुरूम उत्खनन करण्यासाठी स्थानिक माफियांनी सपाटा लावला आहे.
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील एलपीजी गॅस वितरणात होत असलेला भेदभाव त्वरित दूर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले…
पुणे आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या ओतूर-ब्राम्हणवाडा जिल्हा मार्गावरील 'लागाचा घाट' सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
राज्य सरकारकडून केरोसीन वितरणासंदर्भात स्पष्ट धोरण जाहीर न झाल्याने पुणे ग्रामीण भागातील वितरकांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकली असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
शिक्षणाचा अधिकार (आरटीई) प्रवेशप्रक्रिया २०२६ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) कोट्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
आशा भोसले यांनी कल्पिलेल्या संकल्पनेवर आधारित एक संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सरकार सक्रिय उपाययोजना करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी केली.
वादग्रस्त ठरलेल्या पिसर्वे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आरोग्य केंद्राचे अतिक्रमण अखेर 'फिक्स' झाले आहे. राजकीय हस्तक्षेपाने अखेर चिमुकल्यांच्या मैदानाचा घास घेतला.
मुंबई ते बेंगळुरू दरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. अवघ्या १५ तासांत पूर्ण होणार प्रवास आणि फर्स्ट क्लासमध्ये मिळणार हॉट वॉटर शॉवरची सुविधा.
मुंबईमध्ये विविध पत्रकार परिषदा आणि बैठकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत पुरंदर विमानतळ प्रकल्प करणारच अशी ठाम भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये येवूनही मौन बाळगले आहे.
निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.