महफूज आलम आणि वादग्रस्त विधानाचा नकाशा( फोटो सौजन्य: सोशल मीडिया आणि @bdwatch2024)
ढाका: भारत आणि बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेशने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे ‘सल्लागार’ म्हणून कार्यरत महफूज आलम यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी 16 डिसेंबर 1971 च्या विजय दिवसाच्या निमित्ताने भारताविरोधात एक मोठे वक्तव्य केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांनी विजय दिवस हा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या विजयाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम बांगलादेशचा भाग
महफूजने या दिवशी सोशल मीडियावर भारताविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकून विवाद निर्माण केला.याशिवाय महफूज यांनी आपल्या पोस्टमध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम या भारतीय राज्यांना बांगलादेशचा भाग असल्याचे दाखवले. त्यांनी भारतातील उत्तर व ईशान्य भागांतील सांस्कृतिक मतभेद उफाळून आणण्याचा प्रयत्न केला. महफूज यांनी दावा केला आहे की, बांगलादेश व ईशान्य भारतातील लोकांची संस्कृती समान आहे आणि भारतीय उच्चवर्णीय तसेच हिंदू कट्टरपंथी धोरणांमुळे पूर्व पाकिस्तान तयार झाला.
Mahfuj Alam, special aide to Dr. #Yunus and Advisor of Interim Govt made a Facebook post this morning in which he talked of annexing some of India’s eastern and northeastern territories (see the map shared by him).
He alleged that #India maintains a “contain” and “ghettoize”… pic.twitter.com/nkvDVzRDRQ
— Bangladesh Watch (@bdwatch2024) December 17, 2024
1975 आणि 2024 च्या काही विशेष घटनांचा उल्लेख
तसेच 1975 आणि 2024 च्या घटनांचा उल्लेख करून त्यांनी परिस्थिती बदललेली नसल्याचा दावा केला. 1975 मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान व त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. 2024 मध्ये शेख हसीनांना सत्तेवरून हटवण्याचा कट रचल्याचा आरोपही महफूज यांनी केला. बांगलादेशला नव्या व्यवस्थेची आणि भूगोलाची गरज असल्याचे त्याने म्हटले.
वादग्रस्त नकाशा जारी
महफूज आलम यांनी आपल्या सोशल मीडियावर वादग्रस्त नकाशा पोस्ट केला आहे. या नकाशामध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामला बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. आलम यांनी बांगलादेश अजूनही ‘मुक्ती’च्या शोधात असल्याचा दावा केला आहे. मात्र, या पोस्टनंतर वाढलेल्या रोषामुळे काही तासांतच त्यांनी ही पोस्ट हटवली आहे.
महफूज आलम हे कट्टरपंथी विचारसरणीचा नेता असून त्यांनी 2016 मध्ये विद्यापीठ सोडले. त्यानंतर त्यांन विद्यार्थी नेता म्हणून ओळखले जातात. त्याच्या विधानांमधून भारताविरोधी भावना आणि कट्टर इस्लामचा प्रचार करण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो असे म्हटले जात आहे. भारताने या वादग्रस्त नकाशाचा आणि महफूजच्या विधानांचा कडक निषेध केला असून, या प्रकरणावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.