भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (फोटो सौजन्य: एक्स/@MarkJCarney)
Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा
पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सोशल मीडियावरुन या बैठकीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी मुक्त व्यापार कारावर सहमती दर्शवली असून या हा करार कॅनडातील कामगार आणि व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. यामुळे कॅनडा(Canada)ला भारतासारखी एक प्रचंड मोठी आणि नवी बाजारपेठ उपलब्ध होईल.
दोन्ही देशांनी आतापर्यंत झालेल्या चर्चांचा प्रगतीचा आढावाही घेतला. यावेळी काही प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावण्यावर भर देण्यात आला. यामध्ये उर्जा आणि तंत्रज्ञान, खत आणि कृषी क्षेत्र, शिक्षण, पायाभूत सविधा आणि डिजिटल क्षेत्रांचा समावेश आहे.
पीयूष गोयल यांनी म्हटले की, भारत आणि कॅनडाचे संबंध पुन्हा वेगाने सुधारत असून ही एक नवी सुरुवात आहे. दोन्ही पंतप्रधानांनी हा करार २०२६च्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत आणि कॅनडाने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पीयूष गोयल यांनी दौऱ्यात कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आणि कृषी मंत्री हीथ मॅकडोनाल्ज यांचीही भेट घेतली. यावेळी केवळ व्यापारांसाठीच नव्हे, तर दोन्ही देशांतील नागरिकांसाठीही हा करार फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्यासोबत सध्या एक शिष्टमंडळही कॅनडाला गेले आहे. याचा उद्देश दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेला गती देणे आहे. कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सांगण्यात आले की, वाटाघाटींचे दोन टप्पे यशस्वीरित्या सांगण्यात पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. कॅनडाला जागतिक व्यापारात विविधता आणायची असून अमेरिकेतील इतर देशांमध्ये ३०० अब्ज डॉलर्सची निर्यात करणे आवश्यक अधोरेखित करण्यात आली.
We’re negotiating a free trade deal with India. This will be a game changer for Canadian workers and businesses — unlocking a massive new market. We’re working fast — I met Minister @PiyushGoyal to review our progress so far and explore the opportunities ahead for both our… pic.twitter.com/LmiuwQzDmE — Mark Carney (@MarkJCarney) May 26, 2026
Ans: दोन्ही देशांतील मुक्त व्यापारा करार हा व्यासायिक संबंध दृढ करण्यासाठी होणार आहे. याअंतर्गत दोन्ही देशांतील आयात-निर्यात शुल्कात कपात केली जाईल. तसेच यामुळे कॅनडाला भारतासारखी मोठी बाजारपेठ मिळणे सोपे जाईल. २०३० पर्यंत दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचे याचे उद्दिष्ट आहे.
Ans: यामध्ये उर्जा आणि तंत्रज्ञान, खत आणि कृषी क्षेत्र, शिक्षण, पायाभूत सविधा आणि डिजिटल क्षेत्रांचा समावेश आहे.






