भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत-चीन संबंधांना नवी दिशा! दिल्ली-शांघाय थेट उड्डाणे सुरु, अमेरिकेची धाकधूक वाढली
भारत-चीनच्या या रणनीतिक बैठकीत संयुक्त राष्ट्रातील सुधारणांचा मुद्दा सर्वात महत्वाचा आणि लक्षवेधी ठरला. यावेळी मा झाओक्सू यांनी चीनच्या वतीने स्पष्ट केले की, UNSC स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या महत्वकाक्षेंला चीन समजून घेतो आणि त्याचा आदरही करतो. या शब्दांमधून चीनचा थेट पाठिंबा नसला तरी भारतासाठी हे विधान जागतिक राजकाराणातील भूमिकेसाठी सकारात्मक आणि महत्वपूर्ण मानले जात आहे.
दरम्यान दिल्लीतील या बैठकी भारत आणि चीनने द्विपक्षीय संबंध (India China Realations) अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यामध्ये दोन्ही देशांनी भारत-चीन सीमांवर शांतता प्रस्थापित करणे, स्थिर द्विपक्षीय संबंध राखण्याच्या मुद्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये जागतिक स्थिरतेसाठी सीमा वाद सोडवण्यावर सहमती झाली. यासाठी संतुलित आणि स्थिर संबंध आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले.
या बैठकीत विक्रम मिस्री यांनी दोन्ही देशांतील मानसोरवर यात्रेच्या पुनररांभाचे स्वागत केले आणि भविष्यात यात्रेचा आवाका अधिक वाढविण्यासाठीही भर दिला. तसेच भारत आणि चीनमधील विमान सेवा सुरळित करण्यासाठी पुन्हा एकदा व्हिसा प्रक्रिया सुलक्ष करण्यावर ठोस निर्णय घेण्यावर भर दिला. याशिवाय पर्यटन, व्यापार आणि शैक्षणिक देवाण-घेवाणीच्या मुद्यांवरही सकारात्मक पावले उचलण्यावर चर्चा झाली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात झालेल्या जुन्या करारांच्या अंमलबजावणीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
भारत आणि चीनमधील संबंध गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर निवळताना दिसत असून हा एक सकारात्मक बदल आहे. दोन्ही देशांमधील सततच्या द्विपक्षीय बैठकांमुळे अनेक सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. द्विपक्षीय बैठकांमध्ये संबंधांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. लोक-ते-लोक संवाद वाढवण्यासाठी महत्वाची पाउले उचलली गेली आहे. तसेच संवेदनशील मुद्यांवर परस्पर संवादातून चिंता दूर केली जात आहे.
Ans: चीनने दिल्ली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट केले की, UNSC स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या महत्त्वाकांक्षेला चीन समजून घेतो आणि तिचा आदर करतो.
Ans: सीमावादावर शांतता प्रस्थापित करणे, द्विपक्षीय संबंध स्थिर ठेवणे, संयुक्त राष्ट्रातील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रेचा पुनरारंभ, व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे, तसेच व्यापार-पर्यटन-शैक्षणिक देवाणघेवाण, लोक-ते-लोक संवाद यांसारख्या मुद्यांवर दिल्लीती भारत-चीन उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली.






