Middle East Conflict : अमेरिका-इराण तणाव वाढला! भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सतत हल्ले सुरु होते. दोन्ही देशांतील तणाव आता अधिक वाढला असून या संघर्षाचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत पसरु लागले आहे. अनेक भागातंली सुरक्षा अस्थिर झाली असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने तेहरानमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी केली आहे.
धिकृत निवेदन जारी करत भारतीय दूतावासाने म्हटले की, ज्या नागरिकांना काही कारणांमुळे इराणध्येच रहावे लागणार आहे त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. स्थानिक सरकारच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सुरक्षा परिस्थितीबाबत सतत माहिती घेत रहावी.
संवेदनशील आणि लष्करीदृष्टी महत्त्वाच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला भारतीय नागरिकांना देण्यात आला आहे. दूतावासाने नागरिकांना अधिकृत आणि स्थानिक वृत्तांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती वेगाने बदलण्याची शक्यता असल्याने कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे.
तसेच दूतावासाकडे नोंदणी न केलेल्या भारतीयांना तातडीने संपर्क साधण्याचा आणि तपशील देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आली आहे. तसेच शक्य असल्यास तातडीने देश सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मध्यपूर्वेतील वाढता तणाव पाहता भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी प्रवासविषयक सूचनाही जारी केल्या आहेत. अशा परिस्थितीत इराणचा किंवा मध्यपूर्वेतील देशांचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत सरकार सध्या इराणमधील भारतीयांच्या सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देण्यासाठी तयारी सुरु आहे.
Advisory as on 19 July 2026. pic.twitter.com/6vYWY5esa2 — India in Iran (@India_in_Iran) July 19, 2026
US Visa Rules : व्हिसा नियमात मोठा बदल! US मध्ये राहण्याची मर्यादा आता ४ वर्षे; लाखो भारतीयांना धोका






