लहान मुलांना हेल्मेट घालणे बंधनकारक (फोटो- istockphoto)
9 महिन्यांपासून 4 वर्षांच्या मुलांना हेल्मेट घालणे बंधनकारक
कर्नाटक हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी
सध्या देशभरात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत. कर्नाटकमध्ये आता 9 महीने 4 वर्षापर्यंतच्या मुलांनाहेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांचे पालन करण्यासाठी कोर्टाने राज्य सरकारला पावले उचलण्याचे आदेश दिले होते.
लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने केंद्रीय मोटार वाहन नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये वेगमर्यादा आणि हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर वाहुटक पोलिस सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 9 महिन्यांपासून 4 वर्षांच्या मुलांपर्यंत हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात असल्याचे बंगळुरू वाहतूक पोलिस आयुक्त कार्तिक रेड्डी यांनी सांगितले.
हेल्मेट न वापरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार
दुचाकीवरून प्रवास करताना अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीएमपीएमएल आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून ये-जा करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे अशा निष्काळजी वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हेदेखील वाचा : Pune Metro: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार! ‘या’ मेट्रोमार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू
दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बसचालकांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. अपघात टाळणे, सुरक्षित वाहनचालक पद्धती, वाहतूक नियमांचे पालन याबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असून सर्वच विभागांना नियम पालनाबाबत काटेकोर भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






