फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Education Ministers Degrees: भारताच्या शिक्षण व्यवस्थेला योग्य दिशा देण्यात देशाच्या शिक्षणमंत्र्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणंमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होते. त्यांच्याच कार्यकाळात आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा भक्कम पाया रचाला गेला.
माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी हे देशातील सर्वात सुशिक्षित नेत्यापैकी एक मानले जातात. त्यांनी मेरठ कॉलेजमधून बीएससी (B.Sc.) ची पदवी घेतली होती. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी फिजिक्समध्ये एमएससी (M.Sc.)आणि ‘स्पेक्ट्रोस्कोपी’ या विषयात डी.फिल. (D.Phil.) म्हणजेच डॉक्टरेट संपादित केली होती. राजकारणात येण्यापूर्वी ते एक शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ होते.
माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. कर्ण सिंह यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत प्रभावशाली राहिली आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण डेहराडून येथून तर बीए (B.A.) जम्मू काश्मिर विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर (M.A.) शिक्षण मिळवून येथेच पीएचडी (Ph.D.) पदवी संपादन केली.
मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये प्रताप चंद्र चंदर यांनी शिक्षणमंत्री म्हणून कार्य केले. त्यांची शैक्षणिक पात्रताही खूप प्रभावी होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून इतिहास विषयात बीए ऑनर्स (B.A. Honors), एलएलबी (LL.B.) आणि काला शाखेत डी.फिल. (D.Phil.) ची पदवी मिळवली होती. भारतीय शिक्षण व्यवस्थेत १०+२+३ (10+2+3) ही शैक्षणिक पद्धत लागू करण्यात त्यांचेच प्रयत्न होते.
एम. सी. छागला हे १९६३ ते १९६६ या काळात देशात शिक्षणमंत्री होते. त्यांनी मुंबईच्या सेंट जेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यापुढील उच्च शिक्षणासाठी ते ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लिंकन कॉलेजमध्ये गेले. कायदा, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय मानले जाते.
हुमायू कबीर यांनी वर्ष १९६३ मध्ये काही काळासाठी शिक्षणमंत्र्याचे पद सांभाळले होते. ते एक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एक्सेटर कॉलेजमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते.
सध्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेसुद्धा उच्च शिक्षित आहेत. त्यांनी उत्कल विद्यापीठातून मानववंशशास्त्र(Anthropology) या विषयात पदव्युत्तर पदवी(Master’s Degree) प्राप्त केली आहे. त्यांच्या कार्यकाळात नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020), डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रावर भर दिला जात आहे.






