काय घडलं नेमकं ?
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रितेश कोणका असे आहे. सोमवारी डोंबिवलीतील सहा मित्रांचा ग्रुप ट्रेकिंगच्या उद्देशाने इर्शाळवाडी येथे पोहोचला होता. यामध्ये साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेट्टी आणि रितेश कोणका यांचा समावेश होता. ट्रेक चढत असताना अचानक रितेशला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याची प्रकृती खालावली. त्याच्या मित्रांनी त्याला पाणी देऊन सावरण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन मित्रांनी तातडीने पायथ्याला धाव घेतली आणि स्थानिक ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. दुर्गम भाग असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने पारंपारिक झोळी तयार करून रितेशला डोंगरावरून खाली आणले, मात्र दुर्दैवाने डोंगरावरून खाली येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Madhyapradesh Crime: “जीन्स घालू नको” म्हणत सासऱ्यांनी केला विरोध, नवविवाहितेने संपवलं जीवन
उष्माघात की हृदयविकाराचा झटका?
रितेशच्या मृत्यू मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा असे बोलले जात आहे. मृत्यू मागचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समोर येईल. या घटनेने त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Ans: मृत तरुणाचे नाव रितेश कोणका आहे.
Ans: ही घटना खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गडावर घडली.
Ans: उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका हा प्राथमिक संशय आहे.






