काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सौरव सविता उर्फ टोनी (२२ वर्ष) असे आहे. ते हत्या झालेल्या तरुणीचे नाव राणी उर्फ शालिनी (१८ वर्ष) असे आहे. मृत सौरव आणि राणी हे दोघेही सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला का पुरवा गावचे रहिवासी होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र नात्याने ते चुलत बहीण-भाऊ लागत असल्याने कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध झुगारून सुमारे तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घराबाहेर पडून कोर्ट मॅरेज केले होते. लग्नानंतर दोघे काही दिवस दिल्लीत राहत होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच ते कानपूरला परतले आणि एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भाड्याने खोली घेऊन राहू लागले होते.
तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण
मंगळवारी (28 जुलै) दुपारी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला व्हेंटिलेटरमधून (रोशनदान) तरुण पंख्याला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना राणीचा जमिनीवर मृतदेह आढळून आला आणि सौरवच मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:चे आयुष्य संपवले असे दिसून येत आहे, परंतु मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.
तरुणीची आई आणि घरमालकाने काय सांगितलं?
या घटनेबाबत राणीच्या आईने सांगितले की, घटनेच्या काही वेळ आधीच त्यांचे मुलगी आणि जावयाशी बोलणे झाले होते, तेव्हा कोणत्याही वादाचा संशय आला नव्हता. कोर्ट मॅरेज झाल्यानंतरही सौरवचे कुटुंब राणीचा स्वीकार करत नव्हते आणि दोघांवर वेगळे होण्यासाठी सतत दबाव आणला जात होता, असा आरोप राणीच्या आईने केला आहे. तर घरमालकाला या दांपत्याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. पोलीस सध्या दुचाकीच्या क्रमांकावरून नातेवाईकांशी संपर्क साधून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बर्रा परिसरात.
Ans: पतीने आधी पत्नीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
Ans: दोघे चुलत भाऊ-बहिण नात्याचे असल्याने कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता.






