Ram Mandir Donation Scam:'चंपत राय यांचा हेतू निर्विवाद, पण...'; गोविंद देव गिरी यांचे मोठे विधान
मंदिरातील दान चोरीचे प्रकरणाची माहिती कधी झाली. यात चंपत राय आणि अनिल मिश्रा यात किती दोषी आहेत। अखिलेश यादव यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची माहिती मिळाली की त्यापूर्वीच याची माहिती मिळाली होती. असा सवाल विचारला असता गोविंद गिरी म्हणाले की, याची माहिती चंपत राय यांना ४-५ जूनलाच याची माहिती मिळाली होती. पण चंपत राय यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवरच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार काही लहान नाही, वैयक्तिक पातळीवर ही समस्या सोडवली जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी समोर येऊन एसआयटी चौकशीच मागणी केली.
चंपत राय यांना चोरीची पहिल्यांदा माहिती झाल्यानंतर ते तक्रार करायला गेले का, चोरीची माहिती मिळाल्यानंतर ट्रस्टकडून कारवाई करण्यात आली का, या प्रश्नावर बोलताना गिरी म्हणाले की, चोरीची माहिती झाल्यानंतर कोणतीही ट्रस्टकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. ट्रस्ट या संदर्भात गोंधळून गेले होते त्यामुळे तक्रार करण्यास उशीर झाला. ते असंमज्यातून हा उशीर झाला.
या असमंज्यातून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला का, असा कोणताही प्रयत्न चंपत राय करू शकत नाही. त्यांनी चांगल्या भावनेतून राय यांनी निर्विवाद हेतूने त्यांनी दयेच्या भावनेतून त्यांनी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असावा. त्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली असावी, असे गोविंद गिरी यांनी नमुद केले.
राम मंदिरातील दान चोरीमध्ये कोणाचा हात असावा, हा विश्वासघात केला असावा ? चंपत राय यांचा खासगी ड्रायव्हरच या सर्व चोरीमागचा सुत्रधार होता, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. अशा व्यक्तीला आपल्या सोबत ठेवून राय यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
सगळ्या ट्रस्टमध्ये चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचेच वर्चस्व होते, मग त्यांना या चोरीची माहिती लवकर का मिळाली नाही?
चंपत राय आणि माझा गेल्या ३० वर्षांपासून ओळखतो. त्यामुळ ते अशी चोरी करतील असे वाटत नाही. अनेकदा ते त्यांना मिळालेल्या सुचनाही दुर्लक्ष करत होते. आपणच सर्व कामे सांभाळू शकतो. असे त्यांना वाटत होते. हा त्यांचा स्वभाव दोष असू शकतो, पण हा त्यांच्या चारित्र्याचा दोष नाही.
एसआयटीच्या अहवालानुसार, चोरीच्या कारवाया पाहता मंदिराच्या पूर्ण सिस्टिममध्येच दोष आहे. आता काही मोठा बदल करणार का. यावर बोलताना गिरी म्हणाले की, एसआयटीचा अहवाल आल्यावर आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ,
मंदिर चोरीच्या प्रकरणात ट्रस्ट देशवासियांची माफी मागणार का, आम्ही लज्जित आहोत, दु:खी आहोत. यासाठी आम्ही राम लल्लांची आणि राम भक्तांची माफी मागतो, पण आम्ही विनाकारण या प्रकरणाचा गोंधळ घालत आहेत, त्यांची माफी मागणार नाही.






