पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! (Photo Credit- X)
पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “मित्रांनो, भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलत आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे, ते तुरुंगात खितपत पडले आहेत.”
‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…
पंतप्रधान म्हणाले, “आम्ही फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन केली आहेत. उद्या आम्ही संसदेत एक नवीन कायदा करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत, ज्यामध्ये कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असेल. मात्र, आपल्याला भविष्याचाही विचार करावा लागेल. आपली परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असायला हवी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे.”
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, “या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, आम्ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्च-स्तरीय कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल. या कार्यगटाच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.”
नंदन नीलेकणी यांचे पूर्ण नाव नंदन मोहनराव नीलेकणी आहे. ते एक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत. ते इन्फोसिसचे सह-संस्थापक देखील होते आणि आधार कार्डचे निर्माते म्हणून ओळखले जातात. नीलेकणी यांचा जन्म २ जून १९५५ रोजी बंगळूरु येथे झाला. नंतर त्यांनी आयआयटी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. १९८१ मध्ये, नीलेकणी यांनी एन. आर. नारायण मूर्ती आणि सहा सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली. आज, ही भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक आहे. नीलेकणी यांनी २००२ ते २००७ पर्यंत इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी म्हणून काम केले. २०१७ मध्ये, त्यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 21 व्या वर्षी आमदार-खासदार होण्याची संधी?






