Kalash with Coconut Significance
हिंदू धर्मात तुम्ही बघाल तर पूजा-अर्चा असो, कुठलेही शुभ कार्य असो, देवाची पूजा असो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्हाला कलश आणि त्यावर नारळ असलेला तांब्या देवघरात नक्कीच दिसेल. खास करून गृहप्रवेश असेल किंवा धार्मिक विधी असतील, तेव्हा कलश महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे नारळ आणि कलश यांना धार्मिक विधींमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपण त्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे शोधूया!
हिंदू धर्मग्रंथ वाचले असतील तर त्यात स्पष्ट म्हटले आहे की, कलशातील पाणी हे जीवन, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. देव-देवतांना आवाहन करत असाल तर कलश आणि नारळ फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी एक पुरातन काळापासून धारणा आहे.
नारळाला आपण श्रीफळ असेही म्हणतो. कोणाचा सत्कार करायचा असेल, देवाला गाऱ्हाणे घालायचे असेल किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण नारळ ठेवतो. त्याचे कारण म्हणजे श्रीफळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. नारळावर जे तीन डोळे दिसतात, त्यांना भगवान शिवांच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जाते. देवाला प्रसन्न करण्यासाठी कलशावर नारळ ठेवला जातो.
vastu tips: मुलांच्या खोलीतील रंगांसह या गोष्टींकडेही द्या लक्ष
जल हे आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वच जाणतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे पाण्याचे महत्त्वाचे कार्य आहे, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे कलशातील पाणी नकारात्मक ऊर्जा कमी करून स्थिरता प्रदान करते. तसेच जल मनाला शांतता प्रदान करते.
महाशिवरात्रीच्या दिवशी करा रामायणाचे पठण, होतील घरातील वास्तूदोष दूर






