घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य
घामामुळे वाढलेला चिकटपणा कमी करण्यासाठी उपाय?
उन्हाळ्यात शारीरिक स्वच्छता कशी करावी?
अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे?
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेचे वारे वाहू लागले आहेत. उष्णतेची लाट आल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाले आहेत. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सगळ्यांचं घाम येतो. घाम येणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण जास्त घाम आल्यामुळे चिकचिक होणे आणि दुर्गंधी निर्माण होणे इत्यादी असंख्य समस्या वाढू लागतात. शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
शरीर स्वतःचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात घाम बाहेर टाकते. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच आवश्यक क्षार सुद्धा बाहेर पडून जातात. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यामुळे अंघोळ केल्यानंतर सुद्धा थकल्यासारखे वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आणि थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
सतत येणाऱ्या घामामुळे अंग खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे धूळ, माती आणि मळ अंगावर तसाच साचून राहतो. अशावेळी घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करावा. घामामुळे त्वचेवर तयार होणारे आम्लधर्मीय वातावरण विषाणू शोषून घेतात. ज्यामुळे अंगावर खाज येणे, पुरळ उठणे किंवा त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यामुळे शरीराला घामाचा वास सुद्धा येत नाही.
मागील अनेक वर्षांपासून तुरटीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून नंतर अंघोळ केल्यास शरीर स्वच्छ होईल. तुरटीमध्ये ॲस्ट्रिंजंट आणि अँटीसेप्टिक घटक आढळून येतात, ज्यामुळे अंगावर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यासोबतच पुरळ आणि इन्फेक्शनचा धोका सुद्धा कमी होऊन जातो. शारीरिक दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर सायट्रिक ॲसिड आणि शक्तिशाली अँटी-माइक्रोबियल मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये असलेल्या ऍसिडमुळे त्वचेवर जमा झालेली दुर्गंधी आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते. लिंबाच्या रसाचा वापर शारीरिक स्वच्छतेसाठी केल्यास दुर्गंध पसरवणारे बॅक्टेरिया जास्त वेळ जिवंत राहत नाही. शरीरावर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी सुद्धा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
Migraine: कडाक्याच्या उन्हात मायग्रेनचा त्रास वाढतोय? ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम
थकवा, अशक्तपणा आणि शारीरिक स्वच्छतेसाठी अंघोळीच्या पाण्यात नियमित चमचाभर मीठ टाकून अंघोळ करावी. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते आणि शरीर स्वच्छ राहते. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा आणि सुस्तपणा कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ टाकावे आणि स्वच्छ अंघोळ करावी.
Ans: अतिरिक्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू शकते.
Ans: गुलाबपाण्याचा सुगंध मन शांत करण्यास आणि फ्रेश वाटण्यास मदत करू शकतो.
Ans: पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे, नियमित झोप घेणे आणि उष्णतेपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.






