जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ
महाराष्ट्रासमोर संसर्गजन्य आजारांबरोबरच जीवनशैलीजन्य आजारांचे दुहेरी आव्हान उभे असल्याचे विविध संशोधन आणि अहवालांतून समोर आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि तिच्या संस्थांनी केलेल्या अभ्यासांनुसार राज्यात हिपॅटायटिस-ए, डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवतानाच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.(फोटो सौजन्य – AI)
आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या अभ्यासानुसार २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथे हिपॅटायटिस-ए चा मोठा उद्रेक झाला होता. या उद्रेकात ३२७ संशयित रुग्ण आढळून आले. दूषित पाणीपुरवठा आणि स्वच्छतेतील त्रुटी हे प्रमुख कारण असल्याचे तपासात स्पष्ट झाले.दरम्यान, आयसीएमआरच्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅब नेटवर्कच्या अहवालानुसार २०२५ मध्येतपासण्यात आलेल्या रुग्णांपैकी सुमारे प्रत्येक नऊपैकी एक रुग्ण संसर्गजन्य आजाराने बाधित असल्याचे आढळले. इन्फ्लूएंझा-ए, डेंग्यू, हिपॅटायटिस-ए आणि नोरोव्हायरस हे प्रमुख रोगकारक ठरले.
मुंबईतील आयसीएमआर संबंधित संशोधन संस्थेच्या अभ्यासात मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोगांचा धोका वाढलेला आढळला. अभ्यासानुसार मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये एंडोमेट्रियल (गर्भाशयाच्या आतील अस्तराचा) कर्करोगाचा धोका सुमारे २.२ पट, अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका सुमारे १.७ पट आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका सुमारे १.५ पट अधिक असल्याचे नोंदविण्यात आले. संशोधकांच्या मते लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध, उच्च रक्तदाब आणि रक्तातील चरबीचे वाढलेले प्रमाण हे या वाढीव धोक्यामागील प्रमुख घटक आहेत.
८८ हिपॅटायटिसची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी सुरक्षित पाणीपुरवठा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वेळेवर लसीकरण, संसर्गजन्य आजारांचे निरीक्षण, तसेच मधुमेह आणि लठ्ठपणाविरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांवर आरोग्य विभाग लक्ष देते. मात्र यासह प्रत्येकाने भर दिल्यास महाराष्ट्रातील आरोग्यस्थितीत मोठी सुधारणा होऊ शकते,असे मत डॉ अजय भंडारवार यांनी व्यक्त केले आहे.
Ans: हिपॅटायटिस-ए हा प्रामुख्याने दूषित अन्न किंवा पाण्यामुळे पसरू शकतो. स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याचे पाणी यामुळे धोका कमी करता येतो.
Ans: घराजवळ पाणी साचू देऊ नये, डासांपासून संरक्षण करावे, स्वच्छता राखावी आणि ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: आपल्या दैनंदिन सवयी, आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांना जीवनशैलीजन्य आजार म्हणतात.






