Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद (फोटो सौजन्य-ChatGPT)
शहराचे वाढते कार्यक्षेत्र लक्षात घेता आपत्कालीन घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी तीन उपकेंद्रे कार्यरत आहेत. त्यामध्ये वाळगाव रोडवरील ट्रान्सपोर्टनगर, प्रशांतनगर येथील कार्यशाळा संकुल आणि बडनेरा येथील कनिष्ठ प्रादेशिक कार्यालय या ठिकाणी उपकेंद्रांचा समावेश आहे. या तिन्ही उपकेंद्रांवर २४ तास किमान दोन ते तीन पाण्याचे टँकर उपलब्ध असतात. आग लागल्याची माहिती मिळताच हे टँकर तत्काळ घटनास्थळी रवाना केले जातात. परिस्थिती गंभीर असल्यास इतर उपकेंद्रांमधूनही अतिरिक्त टैंकर मागवले जातात. औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसी संकुलातील अग्निशमन विभागाचे उपकेंद्र गत १० वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे त्या परिसरात आग लागल्यास वाळकट कंपाऊंड, प्रशांत नगर व बडनेरा येथूनच टैंकर पाठवावे लागतात. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसीतील संजय ऑइल मिलमध्ये भीषण आग लागली होती. तेलासह मोठ्या प्रमाणावर गोण्या साठवून ठेवल्यामुळे आग झपाट्याने पसरली.
महानगरपालिकेच्या टँकरमधील पाणी संपल्यावर एमआयडीसीमधून जाणाऱ्या एमजेपीएच्या मुख्य पाइपलाइनमधून टैंकर भरून आग विझवण्याची व्यवस्था करावी लागली होती. तसेच ६ जानेवारी २०२६ रोजी एका रासायनिक कारखान्यात लागलेल्या आगीत महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनांनंतर एमआयडीसीतील अग्निशमन उपकेंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी पुढे आली. मात्र, महानगरपालिकेकडून अद्याप या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
जानेवारी २०२५ – ५३
फेब्रुवारी – ४५
मार्च – १३१
एप्रिल – ७७
मे – ४७
जून – २५
जुलै – ७
ऑगस्ट – ५
सप्टेंबर – ७
ऑक्टोबर – ३५
नोव्हेंबर – २५
डिसेंबर – ३८
जानेवारी २०२६ – २८
फेब्रुवारी – ५२
मार्च-१३९
एकूण – ७०४
Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल






