Washim News: वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस; तिघांना अटक, कामरगाव आणि अहमदनगरातील प्रकार
त्यांनी यापूर्वीही पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेक निवेदने सादर करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला, याच्च निषेधार्थ त्यांनी नागरिकांकडून भीक मागून २१३ रुपये जमा केले. ही रक्कम तत्कालीन ग्रामसचिवांना मनीऑर्डरद्वारे पाठविण्यात यावी, या उद्देशाने त्यांनी ती रक्कम गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केली.
यावेळी त्यांनी सात दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून अपहाराची रक्कम शासन जमा करण्याची मागणी केली. अन्यथा पुढच्या सोमवारी पुन्हा ‘भीक मांगो’ आंदोलन करून जमा झालेली रक्कम संबंधित ग्रामसचिवांना पाठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीला कितपत गती मिळते, याकडे पातूर तालुक्यातील लागले आहे. नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दिग्रस बुद्रूक ग्रामपंचायतीतील निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी विजयकुमार ताले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप चौकशीला अपेक्षित गती मिळाली नसून संबंधित तत्कालीन ग्रामसचिवांना अभय दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल






